शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कुणबी समाजालाही हवा वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 12:42 AM

लोकसंख्येच्या तुलनेत कुणबी समाजापेक्षा कमी असलेल्या मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण मिळाले, पण बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाला त्या आरक्षणाचा वाटा मिळाला नसल्यामुळे या समाजातील बेरोजगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षण : १६ टक्क्यांमध्ये समावेशाची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसंख्येच्या तुलनेत कुणबी समाजापेक्षा कमी असलेल्या मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण मिळाले, पण बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाला त्या आरक्षणाचा वाटा मिळाला नसल्यामुळे या समाजातील बेरोजगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाच्या १६ टक्के आरक्षणात आम्हालाही वाटा द्या, अशी मागणी ठिकठिकाणी जोर धरत आहे.यासंदर्भात कुणबी समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असलेले भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनीही एका पत्रकातून या मागणीला उचलून धरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देऊन त्या समाजाला न्याय दिला. या आरक्षणासाठी ५२ आंदोलने व ४० जणांना बळी जावे लागले. परंतू मराठ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करीत असताना कुणबी समाजाला सोबत घेऊनच आंदोलने केली. मराठा नेते कुणबी आणि मराठा आम्ही एकच आहोत, आमच्यात रोटी-बेटीचे व्यवहार चालतात म्हणून आम्हाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ठ करून घ्यावा, अशी मागणी करीत होते. परंतू ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी विरोध केल्याने सरकारने त्यांना एसबीसी प्रवर्गात समावेश करून एकूण ५१ टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडून तामिळनाडूच्या धर्तीवर १६ टक्के आरक्षण दिले. परंतू जातीनिहाय जनगणना झालेली नसताना मराठ्यांची लोकसंख्या महाराष्ट्रात ३२ टक्के ठरविणे चुकीचे आहे, असे ठाम मत भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्रात १०० टक्क्यांपैकी ५२ टक्के ओबीसी, एससी-एसटी २ टक्के आणि मुस्लिम, ब्राह्मण व तत्सम खुल्या प्रवर्गातील जाती पकडून १०० टक्के लोकसंख्या होते. त्यात ३२ टक्के मराठा समाज दाखविणे चुकीचे असल्याचा आरोप वाघरे यांनी केला.मराठा समाजाकडून संपूर्ण राज्यात आंदोलने केली जात असताना मराठवाड्यात सकल मराठा मोर्चा, तर कोकण, खान्देश आणि विदर्भात मराठा-कुणबी मोर्चा अशा पद्धतीचे होर्डिंग लावून या आंदोलनात कुणबी समाजाला समाविष्ठ करून घेण्यात आले होते. मग आता आरक्षणात कुणबी समाजाला वाटा का नाही? असा सवाल कुणबी समाजातील युवकांकडून केला जात आहे.राज्य सरकार सध्या नोकरभरतीचा गवगवा करीत असल्यामुळे अनेक बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतू त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळेल पण आपल्याला नाही, या कल्पनेने कुणबी समाजातील बेरोजगार युवक अस्वस्थ होत आहेत.ही तर फसवणूकआरक्षणासाठी मराठा समाज खरोखरच पात्र आहे का? आणि या समाजाची लोकसंख्या किती हे तपासण्यासाठी तत्कालीन सरकारने राणे समिती गठीत केली होती. परंतू त्या समितीने गडचिरोली जिल्ह्यात मराठा समाजाची १८ हजार कुटुंब असल्याची माहिती प्रशासनामार्फत शासनाला दिली. वास्तविक विदर्भातील जिल्ह्यांत राहणाऱ्या कुणबी समाजाची गणना मराठा समाजात करून राणे समितीने कुणबी समाजाची फसवणूक केली. महाराष्ट्रात होणाऱ्या मेगाभरतीत कुणबी समाजाला मराठा आरक्षणात वाटा द्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनी केली.

टॅग्स :marathaमराठाreservationआरक्षण