शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शेतातील कचरा जाळल्यास सुपीकता कशी टिकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 14:10 IST

कृषी विभागाचा सल्ला : जाळपोळीमुळे नत्राची मात्रा होते कमी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेती कचरामुक्त ठेवण्याच्या नावाखाली शेतीतील जुन्या पिकाची धसकटे, तणस, पालापाचोळा शेतात जाळून टाकला जातो. यामुळे कचरा तर नष्ट होतोच शिवाय शेतातील धसकटे जाळल्याने शेतीची सुपीकता वाढते, असा गैरसमज आहे. तणस, धसकटे जाळल्याने शेतीतील सुपीकता नष्ट होते. शेतकऱ्यांनी शेतात धसकटे, पालापाचोळा जाळू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

शेतात रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खताची मात्रा वाढवणे आवश्यक असताना शेतकरी गवतवर्गीय पालापाचोळा, गहू, धान पिकाचे धसकट जाळून टाकतात. त्यामुळे जमिनीतील नत्राची मात्रा कमी होते. स्वच्छ दिसणारे शेत म्हणजे सुपीक शेत नाही. जमिनीतील गवतवर्गीय पालापाचोळा, पिकाची धसकटे जाळून न टाकता ती नांगरणीत जमिनीत मुरवल्याने त्यापासून सेंद्रिय खताची मात्रा वाढते व उत्पन्नाची पातळीसुद्धा वाढते. सेंद्रिय खतामधून जमिनीला लागणारे नत्र, स्फुरद, पालाश ही तिन्ही अन्नद्रव्य मिळतात. शेणखत, कंपोस्ट खत, जनावराचे शेणखत, मानवी मल, कोंबड्याची विष्ठा, भुईमुगाची पेंड, कडुनिंबाचा पाला हे सर्व घटक शेतीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खते निर्माण करतात; पण शेतकरी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात व शेतात सेंद्रिय खताची मात्रा मोठ्या प्रमाणात वापरत नसल्याने उत्पन्नावर परिणाम होतो.

राज्य सरकारची डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय मिशन आणि केंद्र सरकारची नैसर्गिक शेती मिशन या दोन महत्त्वाच्या योजना या खरीप हंगामात राबविल्या जाणार आहेत. शेतीतील सेंद्रिय खताची मात्रा कशी वाढवता येईल व शाश्वत शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढविण्यासाठी व रासायनिक खतांचा होणारा परिणाम, वारेमाप खर्च कमी करण्यासाठी कृषी विभागामार्फत या योजना शेतकरी गटामार्फत राबविल्या जाणार आहेत.- नीलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी

ज्या काळात रासायनिक खते नव्हती आणि असली तरी त्याचे प्रमाण कमी होते. तेव्हा शेतकरी पिकाचे अवशेष, हिरवळीचे खत, शेतातील तण आदी कुजवून खत तयार करत असत. यामुळे शेताचा पोत टिकून असायचा. जमिनीची सुपीकता अनेक वर्ष कायम असायची. मात्र, रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे.- केशव गेडाम, शेतकरी, वैरागड 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रGadchiroliगडचिरोलीfarmingशेती