शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील कचरा जाळल्यास सुपीकता कशी टिकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 14:10 IST

कृषी विभागाचा सल्ला : जाळपोळीमुळे नत्राची मात्रा होते कमी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेती कचरामुक्त ठेवण्याच्या नावाखाली शेतीतील जुन्या पिकाची धसकटे, तणस, पालापाचोळा शेतात जाळून टाकला जातो. यामुळे कचरा तर नष्ट होतोच शिवाय शेतातील धसकटे जाळल्याने शेतीची सुपीकता वाढते, असा गैरसमज आहे. तणस, धसकटे जाळल्याने शेतीतील सुपीकता नष्ट होते. शेतकऱ्यांनी शेतात धसकटे, पालापाचोळा जाळू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

शेतात रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खताची मात्रा वाढवणे आवश्यक असताना शेतकरी गवतवर्गीय पालापाचोळा, गहू, धान पिकाचे धसकट जाळून टाकतात. त्यामुळे जमिनीतील नत्राची मात्रा कमी होते. स्वच्छ दिसणारे शेत म्हणजे सुपीक शेत नाही. जमिनीतील गवतवर्गीय पालापाचोळा, पिकाची धसकटे जाळून न टाकता ती नांगरणीत जमिनीत मुरवल्याने त्यापासून सेंद्रिय खताची मात्रा वाढते व उत्पन्नाची पातळीसुद्धा वाढते. सेंद्रिय खतामधून जमिनीला लागणारे नत्र, स्फुरद, पालाश ही तिन्ही अन्नद्रव्य मिळतात. शेणखत, कंपोस्ट खत, जनावराचे शेणखत, मानवी मल, कोंबड्याची विष्ठा, भुईमुगाची पेंड, कडुनिंबाचा पाला हे सर्व घटक शेतीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खते निर्माण करतात; पण शेतकरी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात व शेतात सेंद्रिय खताची मात्रा मोठ्या प्रमाणात वापरत नसल्याने उत्पन्नावर परिणाम होतो.

राज्य सरकारची डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय मिशन आणि केंद्र सरकारची नैसर्गिक शेती मिशन या दोन महत्त्वाच्या योजना या खरीप हंगामात राबविल्या जाणार आहेत. शेतीतील सेंद्रिय खताची मात्रा कशी वाढवता येईल व शाश्वत शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढविण्यासाठी व रासायनिक खतांचा होणारा परिणाम, वारेमाप खर्च कमी करण्यासाठी कृषी विभागामार्फत या योजना शेतकरी गटामार्फत राबविल्या जाणार आहेत.- नीलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी

ज्या काळात रासायनिक खते नव्हती आणि असली तरी त्याचे प्रमाण कमी होते. तेव्हा शेतकरी पिकाचे अवशेष, हिरवळीचे खत, शेतातील तण आदी कुजवून खत तयार करत असत. यामुळे शेताचा पोत टिकून असायचा. जमिनीची सुपीकता अनेक वर्ष कायम असायची. मात्र, रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे.- केशव गेडाम, शेतकरी, वैरागड 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रGadchiroliगडचिरोलीfarmingशेती