शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शेतातील कचरा जाळल्यास सुपीकता कशी टिकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 14:10 IST

कृषी विभागाचा सल्ला : जाळपोळीमुळे नत्राची मात्रा होते कमी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेती कचरामुक्त ठेवण्याच्या नावाखाली शेतीतील जुन्या पिकाची धसकटे, तणस, पालापाचोळा शेतात जाळून टाकला जातो. यामुळे कचरा तर नष्ट होतोच शिवाय शेतातील धसकटे जाळल्याने शेतीची सुपीकता वाढते, असा गैरसमज आहे. तणस, धसकटे जाळल्याने शेतीतील सुपीकता नष्ट होते. शेतकऱ्यांनी शेतात धसकटे, पालापाचोळा जाळू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

शेतात रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खताची मात्रा वाढवणे आवश्यक असताना शेतकरी गवतवर्गीय पालापाचोळा, गहू, धान पिकाचे धसकट जाळून टाकतात. त्यामुळे जमिनीतील नत्राची मात्रा कमी होते. स्वच्छ दिसणारे शेत म्हणजे सुपीक शेत नाही. जमिनीतील गवतवर्गीय पालापाचोळा, पिकाची धसकटे जाळून न टाकता ती नांगरणीत जमिनीत मुरवल्याने त्यापासून सेंद्रिय खताची मात्रा वाढते व उत्पन्नाची पातळीसुद्धा वाढते. सेंद्रिय खतामधून जमिनीला लागणारे नत्र, स्फुरद, पालाश ही तिन्ही अन्नद्रव्य मिळतात. शेणखत, कंपोस्ट खत, जनावराचे शेणखत, मानवी मल, कोंबड्याची विष्ठा, भुईमुगाची पेंड, कडुनिंबाचा पाला हे सर्व घटक शेतीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खते निर्माण करतात; पण शेतकरी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात व शेतात सेंद्रिय खताची मात्रा मोठ्या प्रमाणात वापरत नसल्याने उत्पन्नावर परिणाम होतो.

राज्य सरकारची डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय मिशन आणि केंद्र सरकारची नैसर्गिक शेती मिशन या दोन महत्त्वाच्या योजना या खरीप हंगामात राबविल्या जाणार आहेत. शेतीतील सेंद्रिय खताची मात्रा कशी वाढवता येईल व शाश्वत शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढविण्यासाठी व रासायनिक खतांचा होणारा परिणाम, वारेमाप खर्च कमी करण्यासाठी कृषी विभागामार्फत या योजना शेतकरी गटामार्फत राबविल्या जाणार आहेत.- नीलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी

ज्या काळात रासायनिक खते नव्हती आणि असली तरी त्याचे प्रमाण कमी होते. तेव्हा शेतकरी पिकाचे अवशेष, हिरवळीचे खत, शेतातील तण आदी कुजवून खत तयार करत असत. यामुळे शेताचा पोत टिकून असायचा. जमिनीची सुपीकता अनेक वर्ष कायम असायची. मात्र, रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे.- केशव गेडाम, शेतकरी, वैरागड 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रGadchiroliगडचिरोलीfarmingशेती