शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जिल्ह्यात १५ वर्षे वय झालेली किती वाहने भंगारात निघाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 17:08 IST

दुसऱ्या व्यक्तीला विकले जाते वाहन : नियम पालनाकडे होतेय दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाहन जुने झाले तरी अनेकजण ते वापरातच ठेवतात. जुन्या वाहनांमुळे अपघाताचा धोका असतो. वाहनाचा वापर १५ वर्षे केल्यानंतर ते रस्त्यावर वापरू नये, असा नियम आहे. परंतु सदर नियम धाब्यावर बसवून वाहने सर्रास चालविली जातात. जिल्ह्यात खासगी वाहनधारक आपली वाहने स्क्रॅप योजनेअंतर्गत भंगारात काढत नाहीत; परंतु शासकीय विभाग मात्र १५ वर्षे वापरलेली जुनी वाहने भंगारात काढतात.

शासनाने वाहनांच्या वापराचा कालावधी ठरवून दिलेला आहे. त्यानुसार वाहन वापरणे गरजेचे आहे. अन्यथा वाहनाला अपघात होण्याची शक्यता असते. हाच धोका ओळखून वाहनधारकांना मुदतबाह्य वाहने भंगारात काढण्याची योजना आहे. स्क्रॅप योजनेअंतर्गत सदर वाहने भंगारात काढली जाणे आवश्यक आहे. मात्र, स्क्रॅपसाठी विकण्याच्या तुलनेत एखाद्या व्यक्तीला वाहन विकल्यास त्याची चांगली किंमत मिळते. ही बाब लक्षात घेऊन काही वाहनधारक मुदतबाह्य वाहन दुसऱ्याला विकतात. सदर व्यक्ती सुध्दा वाहन खरेदी करते. या वाहनाने केलेला प्रवास धोक्याचा ठरू शकतो. मुदतबाह्य वाहने दिसून आल्यास आरटीओ मार्फत अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. 

भंगारातील वाहन रस्त्यावर दिसले तर कारवाई काय?

  • जर वाहन पूर्णपणे भंगार झाले असेल आणि चालक ते बेकायदा चालवत असेल तर त्याच्याविरुद्ध कारवाईची तरतूद आहे. आरटीओ तपासणी करताना अशा वाहनांना पकडतात.
  • त्यांची नोंदणी व परमिट रद्द करू शकतात. जर वाहनाची अवस्था अतिशय खराब असेल तर आरटीओ वाहन जप्त करून स्वतः ते भंगारात काढू शकतात.

६२ वाहने काढली भंगारातजिल्ह्यात गत वर्षात एकूण ६२ शासकीय वाहने आरव्हीएसएफ सेंटरवर स्क्रॅप योजनेअंतर्गत भंगारात काढलेली आहेत. याबाबतची माहिती एमएसटीसी पोर्टलवर अपलोड केलेली आहे. सदर वाहनांचा लिलाव करणे बाकी आहे.

खासगी एकही वाहने नाहीजिल्ह्यात स्क्रॅप योजनेअंतर्गत गत वर्षभरात एकही वाहन भंगारात काढण्यात आलेले नाही. केवळ शासकीय कार्यालयीन वाहने भंगारात काढलेली आहेत.अनेक खासगी वाहनधारक वाहने जुनी झाल्यानंतरही वापरतात. सदर वाहने दुसऱ्या व्यक्तीला विकली जातात. हा प्रकार नियमबाह्य आहे.

नियम काय सांगतो?'स्क्रॅप' म्हणजे भंगार, रद्दी किंवा निरुपयोगी वस्तू, ज्याचा उपयोग उत्पादन प्रक्रियेत होत नाही. त्यांचा पुनर्वापर करता येतो. सदर योजनेअंतर्गत जुन्या १५ वर्षे वापरलेल्या वाहनांना भंगारात काढले जाते.

"केवळ शासकीय कार्यालयीन वाहने भंगारात काढण्यासाठी येतात. खासगी वाहने या योजनेअंतर्गत भंगारात काढण्यासाठी कोणतीही व्यक्ती कार्यालयात येत नाहीत. अनेकजण परस्पर ती वाहने भंगारात काढतात."- किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली