शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
2
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
3
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
4
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
5
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
6
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
7
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
8
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
9
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
10
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
11
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
12
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
13
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
14
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
15
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
16
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
17
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
18
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
19
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
20
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?

तीन टप्प्यात शेतकऱ्यांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:57 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात मावा-तुडतुडे आणि बोंडअळीने ग्रस्त पिकांच्या नुकसानासाठी शासनाने जाहीर केलेल्या मदतीपैकी पहिला हप्ता अखेर जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देपहिला हप्ता ९.२० कोटींचा : कोणत्या गावाला आधी मदत द्यायची? प्रशासनापुढे यक्षप्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामात मावा-तुडतुडे आणि बोंडअळीने ग्रस्त पिकांच्या नुकसानासाठी शासनाने जाहीर केलेल्या मदतीपैकी पहिला हप्ता अखेर जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाला आहे. धान आणि कापसाच्या नुकसानीसाठी दिल्या जाणाऱ्या एकूण ३४ कोटी ५३ लाख रुपयांच्या मदतीपैकी तूर्त ९ कोटी २० लाख रुपयेच उपलब्ध झाले आहेत. ती रक्कम वाटप केल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील रक्कम मिळणार आहे. त्यामुळे ही मदत प्रथम कोणत्या गावाला वाटायची आणि नंतरच्या टप्प्यात कोणाला घ्यायचे हे ठरविण्याचा करण्याचा यक्षप्रश्न प्रशासकीय यंत्रणेपुढे उभा ठाकला आहे.शेतकºयांना आता नवीन खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. त्यामुळे शेतकरी बियाणे, खत, मजुरी यासाठी पैशाची जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना आता पैशाची गरज आहे. गेल्या हंगामात खरीप पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात धानाच्या पिकावर मावा-तुडतुडा तर कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. सर्व्हेक्षणानंतर शासनाने गेल्या हिवाळी अधिवेशनात मदत देण्याचा निर्णय जाहीर केला.जिरायती शेतीसाठी हेक्टरी ६८०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) तर बागायती शेतीसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) अशी मदत मिळणार आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेलेच शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात ६९ हजार ५१५ शेतकरी मदतीची रक्कम मिळण्यासाठी पात्र ठरले असून त्यांना ३४ कोटी ५५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. पण सर्व शेतकऱ्यांना मदतीची रक्कम एकाचवेळी मिळणार नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना काही महिने ताटकळत राहावे लागणार आहे.तीन टप्प्यात वाटप केल्या जाणाऱ्या रकमेपैकी गडचिरोली जिल्ह्यासाठी पहिला टप्प्यात ११ कोटींची रक्कम मंजूर झाली. मात्र प्रत्यक्षात ९ कोटी २० लाख एवढीच रक्कम प्राप्त झाली. ही रक्कम आता कोणत्या गावांना वाटायची हे ठरविताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.पूर्ण मदत मिळण्यास लागणार विलंबपहिल्या टप्प्याची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर सर्व तहसीलदारांच्या खात्यात स्थानांतरित केली जाईल. तहसीलदारामार्फत ती रक्कम प्रथम टप्प्यासाठी निवडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. नंतर त्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर शासनाकडून दुसऱ्या टप्प्याची मदत दिली जाईल. ती वाटप झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्याची मदत मिळेल. अशा प्रकारे संपूर्ण मदत मिळण्यासाठी अर्धाअधिक पावसाळा निघून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.केंद्राच्या मदतीअभावी उशीरराज्यात रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली होती. मात्र केंद्राकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्यामुळे राज्य शासनाला एकरकमी मदत देणे जड जात आहे. केंद्र सरकारने अडचणीतील शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत दिल्यास सर्व शेतकऱ्यांना एकाचवेळी मदतीचे वाटप होऊन खरीप हंगामासाठी त्या रकमेचा हातभार लागू शकतो.

टॅग्स :Farmerशेतकरी