शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
6
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
7
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
8
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
9
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
10
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
11
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
12
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
13
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
14
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
15
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
16
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
17
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
18
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
19
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

गोरखनाथ समाजाच्या लोकांची केली आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुपकुमार कमल यांनी आपल्या टीमला सदर झोपड्यांच्या वस्तीमध्ये पाठवून आरोग्य तपासणी करून घेतली. लॉकडाऊनच्या काळात आपण कुठेही जाऊ नये, स्वत:ची काळजी घ्यावी, लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही गावाला जाऊ शकता, अशा सूचना डॉ.कमल यांनी सर्व कुटुंबांना दिल्या आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे अडकून पडले : यवतमाळ जिल्ह्यातून स्थलांतर

लोकमत न्यूज नेटवर्क
भेंडाळा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहे. अशा स्थितीत चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथे विश्वशांती विद्यालयालगतच्या मोकळ्या जागेत तात्पुरत्या झोपड्या बांधून गेल्या १५ ते २० दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील गोरखनाथ समाजाचे ४० ते ५० कुटुंब वास्तव्यास आहेत. या झोपड्यांमधील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या लोकांचा व्यवसाय मंदावला असला तरी त्यांना स्वत:च्या जिल्ह्यातही जाणे शक्य झाले नाही.
भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुपकुमार कमल यांनी आपल्या टीमला सदर झोपड्यांच्या वस्तीमध्ये पाठवून आरोग्य तपासणी करून घेतली. लॉकडाऊनच्या काळात आपण कुठेही जाऊ नये, स्वत:ची काळजी घ्यावी, लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही गावाला जाऊ शकता, अशा सूचना डॉ.कमल यांनी सर्व कुटुंबांना दिल्या आहेत.
गोरखनाथ समाजातील ४० ते ५० कुटुंब झोपड्या बांधून आहेत. या झोपड्यांवर ताडपत्रींचे छत आहे. सदर जमात भटकंती असल्याचे सर्वत्र ओळखले जाते. यवतमाळ जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले गोरखनाथ समाजाचे लोक वर्षातून चार महिने आपले नेहमीचे घर सोडून जिल्हाबाहेर जाऊन पारंपरिक व्यवसाय करतात. बेन्टेक्सच्या वस्तू विकणे, कुकर दुरूस्त करणे, झाडू विकणे आदी कामे करून आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या काही वर्षांपासून या समाजाचे लोक गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी येत आहेत. यंदा चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथे झोपड्या बांधून अल्पावधीच्या व्यवसायासाठी गोरखनाथ समाजाचे कुटुंब येथे आले आहेत.
सदर कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत दारिद्र्याची आहे. विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गात हा समाज मोडतो. दिवाळी नंतर सदर कुटुंबाचे लोक व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर करतात. एप्रिल महिन्यात पुन्हा स्वत:च्या जिल्ह्यात परत जातात. कोरोनामुळे या कुटुंबाचा व्यवसाय थंडबस्त्यात आहे.

शाळकरी मुलेही कुटुंबासोबत
गोरखनाथ समाजाच्या या ५० कुटुंबांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण घेत असलेले १० ते १५ मुले, मुली भेंडाळा येथे झोपड्यांमध्ये आपल्या कुटुंबासोबत वास्तव्य करीत आहेत. सदर मुलांनी त्यांच्या मूळ गावातील शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. मात्र व्यवसायाच्या निमित्ताने व उदरनिर्वाहासाठी कुटुंबासोबत या शाळकरी मुलांनाही आणावे लागले. परिणामी त्यांची शाळा बुडत आहे, अशी माहिती तेथील कुटुंबांकडून मिळाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य