भुयारी मार्गातून धोक्याची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST2020-02-08T06:00:00+5:302020-02-08T06:00:28+5:30

देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागातून रेल्वे मार्ग गेल्याने शहराचे दोन भागात विभाजन झाले. पूर्वेकडील भागातून शहराच्या पश्चीम भागात जाण्यासाठी भूयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे पूर्वी असणारे रेल्वे फाटक तसेच कुरखेडा व लाखांदूर बाजूकडील मार्ग पूर्णत: बंद करण्यात आला. परिणामी या ठिकाणी दोन्ही बाजूला मोठे चौक निर्माण झाले.

Hazard traffic through subway | भुयारी मार्गातून धोक्याची वाहतूक

भुयारी मार्गातून धोक्याची वाहतूक

ठळक मुद्देपर्यायी व्यवस्थेची मागणी : महामंडळाच्या बसगाड्यांना वळविण्यासाठी जागेचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज येथे रेल्वेच्या भूयारी मार्गामुळे चौकात वाहनांची गर्दी वाढत असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना सुद्धा वळविण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे रेल्वेच्या भूयारी मार्गातून धोकादायक वाहतूक होत असल्याचे दिसून येते.
देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागातून रेल्वे मार्ग गेल्याने शहराचे दोन भागात विभाजन झाले. पूर्वेकडील भागातून शहराच्या पश्चीम भागात जाण्यासाठी भूयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे पूर्वी असणारे रेल्वे फाटक तसेच कुरखेडा व लाखांदूर बाजूकडील मार्ग पूर्णत: बंद करण्यात आला. परिणामी या ठिकाणी दोन्ही बाजूला मोठे चौक निर्माण झाले. या दोन्ही चौकात प्रवाशी वाहनांनी आपला ठिय्या मांडला. या ठिकाणी वाहनांची प्रचंड गर्दी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
शहराच्या दोन भागाच्या आवागमनासाठी भूयारी मार्गाची निर्मिती झाली असून हा मार्ग नागमोडी वळणाचा आहे. त्यातच भूयारी मार्गाची उंची मर्यादित असून काही अवजड वाहने सरळ कुरखेडा मार्गावरून बायपास मार्गाने जातात. तसेच लाखांदूर मार्गाने सुद्धा अवजड वाहनांची वाहतूक होत आहे. दरम्यान भूयारी मार्गाच्या तोंडावरच मोठ्या संख्येने प्रवासी वाहने उभी राहत असल्याने भूयारी मार्गातून ये-जा करणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यासाठी जागा राहत नाही. ही समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून कायम आहे.
देसाईगंज शहरातील बसस्थानक हे आरमोरी-कुरखेडा या राज्य महामार्गावर असल्याने कमी पल्ल्याच्या गाड्यांना वळावे लागते. पण वाहनांच्या गर्दीमुळे अनेक वाहकांना बसगाड्या वळविताही येत नाही. कारण त्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. वाहतुकीच्या कोंडीची ही समस्या मार्गी लावण्यासाठी चौकातील उभ्या वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Hazard traffic through subway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.