शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

पीक कर्जासाठी हेलपाटे सुरूच

By admin | Updated: July 11, 2017 00:35 IST

प्रत्येक बँकेला पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी अजूनपर्यंत कर्ज वाटपाची गती अतिशय धिमीच असून ...

केवळ २१ टक्के उद्दिष्ट साध्य : ४० कोटींचे कर्ज वितरणलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रत्येक बँकेला पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी अजूनपर्यंत कर्ज वाटपाची गती अतिशय धिमीच असून जून अखेरपर्यंत उद्दिष्टाच्या केवळ २१ टक्के कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. कित्येक शेतकरी शेतीची कामे सोडून कर्जासाठी बँकांचे हेलपाटे मारीत असल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बेताची राहत असल्याने शेती करण्यासाठी कर्ज काढल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय राहत नाही. सावकार व बचतगट सुमारे ३६ ते ६० टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारतात. सावकाराच्या पाशातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शासनाने राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करणे सक्तीचे केले आहे. प्रत्येक बँकेला कर्ज वितरणाचे उद्दिष्ट सुद्धा ठरवून देण्यात आले आहे. मात्र शेतकरीवर्ग कर्ज परत करीत नाही, अशी चुकीची मानसिकता बँकांच्या अधिकाऱ्यांची झाली असल्याने राष्ट्रीयकृत बँका कर्ज वितरणास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र दिसून येते. दरवर्षीप्रमाणेच याचा प्रत्यय यावर्षीसुद्धा येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे पऱ्हे पेरणीयोग्य झाले आहेत व सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. अशा शेतकऱ्यांनी रोवणीची कामे सुरू केली आहेत. रोवणीच्या कामासासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासत असल्याने शेतकऱ्यांनी बँकांकडे कर्जाची मागणी केली आहे. मात्र बँकांनी विविध कारणे सांगून कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा अनुभव आहे. चालू खरीप हंगामात जिल्हाभरातून सर्वच बँकांना १९४ कोटी ६२ लाख रूपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र आता ३० जूनपर्यंत केवळ ३९ कोटी ९७ लाख रूपयांची कर्ज वितरित झाले आहे. ९ हजार ८४४ शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांकडे धान रोवणीसाठी पैसे नाही. त्यामुळे सदर शेतकरी बँकांसह सावकाराकडेही कर्जाची मागणी करीत असल्याचे दिसून येत आहे. सातबारा कोरा झालेल्यांना कर्ज नाहीचसातबारा कोरा झाला नंतर संबंधित शेतकऱ्यांना तत्काळ नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित बँकांना शासनाने दिले आहेत. मात्र बँकांनी या शेतकऱ्यांना तर अजूनपर्यंत एकही रूपयाचे कर्ज दिले नाही. सदर शेतकऱ्याचा सातबारा तर कोरा झाला. मात्र पैशासाठी अजुनही वनवनच भटकावे लागत आहे. विविध कारणे सांगून राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत.