शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

शिक्षकांनो, रूजू व्हा! अन्यथा कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 11:45 PM

आॅनलाईन बदलीदरम्यान अपेक्षित शाळा न मिळाल्याने काही शिक्षकांनी जाणूनबुजून वैद्यकीय रजा घेतल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. संबंधित शिक्षकांनी सात दिवसांच्या आत रूजू व्हावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, .........

ठळक मुद्देसीईओंच्या परिपत्रकानंतर शिक्षकांमध्ये खळबळ : इच्छित शाळा न मिळाल्याने शिक्षक वैद्यकीय रजेवर

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आॅनलाईन बदलीदरम्यान अपेक्षित शाळा न मिळाल्याने काही शिक्षकांनी जाणूनबुजून वैद्यकीय रजा घेतल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. संबंधित शिक्षकांनी सात दिवसांच्या आत रूजू व्हावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे परिपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी १६ आॅगस्ट रोजी काढले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक शाळा नक्षलग्रस्त, आदिवासी बहूल व जंगल भागात आहेत. काही गावांना जाण्यासाठी रस्ता नाही. नदी, नाले पार करून शाळेत जावे लागते. तर काही गावांचे अंतर तालुकास्थळापासून १०० ते १२० किमी असल्याने तालुकास्थळी राहून अपडाऊन करणेही शक्य होत नाही. एवढेच नाही तर अहेरी, एटापल्ली तालुक्यातील काही शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना सीमेलगत असलेल्या छत्तीसगड राज्यातील गावांमध्ये भाड्याचे घर करून राहावे लागते. गडचिरोली जिल्ह्यातील या भौगोलिक परिस्थितीमुळे दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षक कर्तव्य बजावण्यास तयार होत नाही.शिक्षकांच्या यावर्षी आॅनलाईन बदल्या झाल्या. आजपर्यंत शहराजवळ राहून अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना सरळ सीमावर्ती भागांमध्ये नियुक्ती देण्यात आली. तर काही शिक्षकांवर आॅनलाईन बदलीमध्ये अन्याय झाला आहे. अन्यायग्रस्त तसेच दुर्गम भागात कर्तव्य बजावण्याची इच्छा नसलेल्या काही शिक्षकांनी वैद्यकीय रजेचा पर्याय अवलंबला आहे.आधीच गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ३०० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दोन शिक्षकी शाळांमध्ये एका शिक्षकाची नियुक्ती करून शाळा चालविली जात आहे. एका शिक्षकाला प्रशासकीय कामे, चार वर्गांना अध्यापन करावे लागत आहे. एखादे दिवशी प्रशासकीय काम आल्यास शाळा बंद ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा स्थितीत इच्छित शाळा न मिळाल्याचे कारण पुढे करून काही शिक्षकांनी वैद्यकीय रजा घेतल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांची आणखी टंचाई निर्माण झाली आहे. ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लक्षात आल्यानंतर संबंधित शिक्षकांनी सात दिवसांच्या आत कर्तव्याच्या ठिकाणी रूजू व्हावे. सात दिवसांमध्ये जे शिक्षक कर्तव्यस्थळी रूजू होणार नाहीत, त्यानंतर त्यांना गट शिक्षणाधिकाºयांनी परस्पर रूजू करून न घेता वैद्यकीय मंडळाकडे प्रमाणपत्र सादर करण्याकरिता निर्देशीत करावे. आजारी नसल्याचे सिध्द झाल्यास तसेच खोट्या कारणावरून रजेवर गेल्याचे आढळून आल्यास अशा शिक्षकांवर बडतर्फ करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा परिपत्रकातून दिला आहे. या परिपत्रकामुळे शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे.गट शिक्षणाधिकाऱ्यांनाही इशारासात दिवसांच्या आत जे शिक्षक स्वत:हून कर्तव्यावर रूजू होणार नाहीत, अशा शिक्षकांना नंतर गट शिक्षणाधिकारी यांनी रूजू करून घेऊ नये. संबंधित शिक्षकांना वैद्यकीय मंडळाकडेच पाठवावे. त्यांना वैद्यकीय मंडळाकडे हजर न केल्यास पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाºयांनाच जबाबदार धरण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे गट शिक्षणाधिकाºयांनी संबंधित शिक्षकांना फोन करून याबाबतची माहिती दिली जात आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदली