शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

भूजल पातळी अर्ध्या मीटरने खोलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:45 PM

भूजल सर्वेक्षण विभागाने मार्च महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी अर्धा मीटरने खोल गेली आहे. दरवर्षीच पाणी पातळी खोल जात असल्याने भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे११२ विहिरींची पाहणी : सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण विभागाचे असेही निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भूजल सर्वेक्षण विभागाने मार्च महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी अर्धा मीटरने खोल गेली आहे. दरवर्षीच पाणी पातळी खोल जात असल्याने भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.गडचिरोली जिल्ह्यात वर्षभरात १३०० मिमी पाऊस पडते. राज्यात सर्वाधिक पाऊस पडणारा जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. पर्जन्यमान अधिक असल्याने पाणी पातळीही वरच राहत होती. जास्तीत जास्त मे महिन्यात थोडीफार पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. मात्र मागील काही वर्षांपासून जमिनीतील पाण्याचा उपसा वाढला आहे. शहरात तसेच ग्रामीण भागातही बोअर मारले जात आहेत. बोअर हे १०० ते २०० फुटापर्यंत राहतात. बोअरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. सिंचन विहिरींच्या माध्यमातूनही पाणी उपसा होत आहे. मात्र पाणी साठून राहिल, यासाठी उपाययोजना होत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे.भूजल पातळी मोजण्याचे काम भूजल सर्वेक्षण विभाग करतो. यासाठी बाराही तालुक्यात ११२ विहिरी ठरविण्यात आले आहेत. या विहिरींच्या निरिक्षणातून पाणी पातळीबाबतचा अंदाज बांधला जातो. मार्च महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण केले होते. यामध्ये आरमोरी व मुलचेरा तालुक्यात भूजल पातळी सर्वाधिक ०.६३ मीटरने खोल गेली आहे. धानोरा तालुक्याची भूजल पातळी ०.६१ मीटर, गडचिरोली ०.४३ मीटर, देसाईगंज ०.६० मीटर, अहेरी ०.३२ मीटर, एटापल्ली ०.३० मीटर, भामरागड ०.१३ मीटरने घटली आहे. दरवर्षी जवळपास अर्धा मीटरने भूजल पातळी घटत असल्याने ही भविष्यात धोक्याची घंटा ठरणारी आहे.बोअर खोल खोदण्याची स्पर्धा थांबायला हवीजमिनीत एका विशिष्ट पातळीपर्यंत पाणी मिळते. त्यानंतर पाणी मिळत नाही. त्यामुळे जेवढे खोल खोदू तेवढे पाणी अधिक मिळेल, हा गैरसमज मनातून काढून टाकला पाहिजे. सद्य:स्थितीत विहिरींना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हिच परिस्थिती कायम राहिल्यास विहिरी पूर्णपणे कोरड्या पडतील व हळूहळू १०० फुट खोल खोदलेल्या हातपंपातूनही पाणी येणार नाही. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे. तसेच जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरेल, यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई