शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

पीक कर्ज वितरण व पुनर्गठन कामाकडे सरकारचे दुर्लक्ष

By admin | Updated: June 25, 2016 01:15 IST

विदर्भाचा मुख्यमंत्री व अर्थमंत्री असूनही धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा राज्य सरकारकडून देण्यात आलेला नाही.

विजय वडेट्टीवार यांचा आरोप : ४४ टक्के शेतकरी कर्जापासून वंचित राहणारगडचिरोली : विदर्भाचा मुख्यमंत्री व अर्थमंत्री असूनही धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा राज्य सरकारकडून देण्यात आलेला नाही. राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज वितरणाचे काम बंद असल्यासारखेच आहे. पीक कर्ज वितरण व पुनर्गठन या कामाबाबत राज्य सरकारला आवश्यक त्या उपाययोजना करता आल्या नसल्याने ४४ टक्के शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार आहे, असा आरोप काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत केला. आ. वडेट्टीवार म्हणाले की, १५ मे पूर्वी शासनाने कर्ज पुनर्गठनाची कार्यवाही करणे आवश्यक होते. परंतु सुरूवातीला यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली नव्हती. १५ मे नंतर कर्ज पुनर्गठन कामासाठी मुदतवाढ दिली असती, तर ७ जूनपर्यंत कर्ज वितरण शेतकऱ्यांना होऊ शकले असते. आता ३१ जुलै पर्यंत कापूस, धान व सोयाबिन या पिकाची पेरणी व लागवड करायचे काम राहत नाही. त्यामुळे पीक कर्जाचा काहीही उपयोग धान उत्पादकांना रोवणी कामासाठी होणार आहे. भाजप प्रणित सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास नसल्याने बेजबाबदार आदेश देण्यात आले व ही शेतकऱ्यांची थट्टाच आहे, असा आरोपही आ. वडेट्टीवारांनी केला. राज्यात आत्तापर्यंत सहा वेळा कर्जाचे पुनर्गठन करण्याचे काम करण्यात आले. त्यापैकी पाचवेळा काँग्रेस सरकारच्या काळात हे काम झाले. एकदा युती सरकारने हे काम केले होते. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले नसल्याने चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी शेकडो हेक्टर जमीन पडीत राहणार आहे, असेही आ. वडेट्टीवार यावेळी म्हणाले. शासनाने या प्रश्नांची गंभीरता लक्षात घेऊन आठ दिवसांत उपाययोजना करावी. काँग्रेस पक्षाकडून वारंवार कर्ज माफीची मागणी करण्यात येत आहे. मागील तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळात पिचून गेला आहे. त्याला कर्जमाफीशिवाय दिलासा मिळणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली असून संरक्षण क्षेत्रात १०० टक्के एफडीआय लागू करणे हे देश हिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही. देशातील बँका एसबीआयमध्ये विलिनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक बँकांची कर्ज वितरणाची स्थितीही राहिलेली नाही, असेही आ. वडेट्टीवार म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)पक्षाला फायदा असणाऱ्यांनाच न. प. निवडणुकीपूर्वी प्रवेश देऊगडचिरोली शहरात काँग्रेस पक्षाकडे नगर परिषद निवडणुकीपूर्वी अनेकांची पक्ष प्रवेशाची इच्छा आहे. मात्र पक्षाला त्यांचा किती फायदा होईल, ही बाब लक्षात घेऊनच अशा लोकांचा प्रवेश करवून घेतला जाईल. विद्यमान नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी मागील साडेचार वर्षात कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. अनेक निविदा प्रक्रिया मॅनेज करण्याचे काम आत्ताही सुरू आहे. अशा भ्रष्ट लोकांना काँग्रेस पक्षात प्रवेश देऊन आपल्या पायावर पक्ष धोंडा मारून घेणार नाही, असे स्पष्ट संकेत आ. वडेट्टीवार यांनी दिले. गडचिरोली शहरात आठ हजारांवर लोकसंख्या दलित समाजाची आहे. पाच हजारावर लोकसंख्या तेली समाजाची आहे. त्या खालोखाल कुणबी, मुस्लीम, माळी, भोई या समाजाची आहे. त्यामुळे या समाजाचे समिकरण साधून काँग्रेस पक्ष योग्य उमेदवार देईल. इतर पक्षांची उमेदवाराबाबतची रणनीती स्पष्ट झाल्यानंतरच काँग्रेस याबाबत निर्णय घेईल, असेही आ. वडेट्टीवार म्हणाले. दोन वर्षांपासून गोसेखुर्दला निधी नाहीडॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळात राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित झालेल्या पूर्व विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पाला भाजप प्रणित केंद्र सरकारकडून मागील दोन वर्षांत एकदाही निधी देण्यात आलेला नाही. हा प्रकल्प पूर्णत्त्वास नेण्यासाठी आठ हजार कोटी रूपयांची गरज आहे. परंतु मागील दोन वर्षांत एकही निविदा कामाबाबत निघाली नाही. आसोलामेंढा धरणात गोसेखुर्दचे पाणी टाकून ५० हजार हेक्टर सिंचन क्षमता वाढणार, असा खोटा अहवाल राज्य सरकारने पाठविला होता. या संदर्भात आपण आक्षेप नोंदविल्यावर १४ हजार कोटीचे एक टेंडर काढण्यात आले, अशी माहिती आ. वडेट्टीवार यांनी दिली.