शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

"सायकल मिळाली, आता रोज शाळेत जायचं अन् अधिकारी बनायचं"; अजित पवारांनी साधला विद्यार्थिनींशी संवाद

By संजय तिपाले | Updated: December 17, 2023 20:14 IST

भामरागड तालुक्यातील अतिसंवेदनशील नारगुंडा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १७ डिसेंबरला भेट दिली.

गडचिरोली : तुला सायकल चालवता येते ना, नसेल तर शिकून घे... सायकल मिळाली आता रोज शाळेत जायचं अन् चांगले शिक्षण घेऊन अधिकारी बनायचं... अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिदुर्गम व नक्षलप्रभावित नारगुंडा (ता.भामरागड) येथील पोलिस मदत केंद्रात आयोजित जनजागरण मेळाव्यात आदिवासी विद्यार्थिनींशी संवाद साधून प्रोत्साहन दिले.

भामरागड तालुक्यातील अतिसंवेदनशील नारगुंडा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १७ डिसेंबरला भेट दिली. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक कुमार चिंता, यतीश देशमुख, एम. रमेश, उपअधीक्षक बापूराव दडस हे उपस्थित होते. पारंपरिक आदिवासी रेला नृत्य सादर करुन स्वागत झाले.

यावेळी पाेलिस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पार पडले. त्यानंतर सुरक्षा गार्ड, पोलीस अधिकारी व अंमलदारांचे बॅरेक, एसआरपीएफ अंमलदार बॅरेकची उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. जनजागरण मेळाव्यात आदिवासींना विविध प्रमाणपत्रांचे वाटप, स्प्रे पंप, शालेय मुलांना सायकल, क्रिकेट किट, व्हॉलिबॉल व नेट, ड्रेस, लोणचे पापड किट, स्वयंपाकासाठी लागणारी भांडी, धोतर, टी-शर्ट, लोअर, ब्लॅकेट, स्वेटर, बेडशिट, महिलांना साड्या व इतर भेटवस्तूंचे वाटप केले.

यावेळी अजित पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. काही मुलांना त्यांनी पाढे म्हणतात येतात का, असा प्रश्नही केला. आदिवासींशीही त्यांनी संवाद साधला. रेशन व आरोग्य सुविधा मिळतात का, अशी विचारणा केली. आपल्या भाषणात त्यांनी जिल्हा पोलिस दल अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करत असल्याचा उल्लेख करुन दुर्गम -अतिदुर्गम भागाच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही दिली. सूत्रसंचालन उपनिरीक्षक भारत निकाळजे यांनी केले तर आभार अपर अधीक्षक एम. रमेश यांनी मानले. नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील, नारगुंडाचे प्रभारी अधिकारी सतीश बेले व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

२०२२ मध्ये स्थापन करण्यात केलेल्या सुरजागड येथील पोलिस मदत केंद्रालाही त्यांनी भेट दिली. तेथे त्यांनी जवानांशी संवाद साधला. त्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

धर्मरावबाबांनी साधला गोंडी भाषेत संवाद -नारगुंडा पोलिस मदत केंद्राच्या जनजागरण मेळाव्यात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गोंडी भाषेत भाषण केले. त्यांनी आदिवासींना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. राज्य सरकार आदिवासींच्या विकासासाठी कटीबध्द असून नवनवीन उद्योग येत आहेत, यातून रोजगार मिळत आहे, त्यामुळे मागास भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारGadchiroliगडचिरोलीStudentविद्यार्थीSchoolशाळा