शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

गोंडवाना विद्यापीठाला वन आणि आदिवासी संशोधन केंद्र बनवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 21:01 IST

केंद्र सरकारकडून गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी मोठा निधी मिळेल. त्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

ठळक मुद्देदोन टप्प्यात विकासउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासीबहुल आणि जंगलाने आच्छादित असलेल्या भागात असणारे गोंडवाना विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ आहे. त्यामुळे या विद्यापीठाला वन आणि आदिवासी संशोधनाचे केंद्र बनविण्यासाठी कायद्यात योग्य त्या सुधारणा करून विशेष विद्यापीठाचा दर्जा मिळू शकतो. तसे झाल्यास केंद्र सरकारकडून या विद्यापीठाच्या विकासासाठी मोठा निधी मिळेल. त्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

गोंडवाना विद्यापीठाने येत्या ५ ऑक्टोबरपासून विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा आढावा घेण्यासाठी ना.सामंत सोमवारी गडचिरोलीत आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विद्यापीठाशी निगडीत विविध विषयांची माहिती दिली. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले, उच्च शिक्षण सहसंचालक साळुंखे आणि सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी ना.सामंत म्हणाले, दोन टप्प्यात विद्यापीठाचा विकास करण्याचे नियोजन आहे. त्यात पहिल्या टप्प्यात १९१ एकरापैकी ५० एकर जागेची खरेदी आणि त्यावरील इमारत बांधकामाचा प्रश्न मार्गी लावणार तर दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारकडून निधी प्राप्त करून पुढील कामे केली जातील. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सकारात्मक असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे या विषयावर बोलणेही झाले असल्याचे ते म्हणाले. गोंडवाना विद्यापीठाला ‘मॉडेल कॉलेज’ करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे ना.सामंत यांनी सांगितले.कोरोनाची परिस्थिती थोडी सावरल्यानंतर राज्यातील सर्वच भागात प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्याची परवानगी दिली जाईल. विविध आरक्षणाच्या बाबतीतही सर्व शंकांचे निरसन केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

तांत्रिक अडचणी आल्या तरी परीक्षा देता येणार१७ हजार २२९ विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा देत आहेत. त्यात केवळ ७०६ विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडला आहे. ऑनलाईन परीक्षेत दुर्गम भागात वेळेवर नेटवर्कची समस्या निर्माण झाली तर त्या विद्यार्थ्यांचा पेपर पुन्हा घेतला जाईल. पण कोणीही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास ना.सामंत यांनी दिला.

सहसंचालक कार्यालयाचे केंद्र गडचिरोलीतउच्चशिक्षण सहसंचालकांचे कार्यालय नागपूर येथे आहे. गडचिरोली किंवा चंद्रपूर जिल्ह्यातून नागपूरला जाण्यासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. हा त्रास वाचवण्यासाठी त्यांच्या कार्यालयाचे एक केंद्र गडचिरोलीत सुरू करण्याचा निर्णय मुंबईत गेल्यानंतर काढणार असल्याचे मंत्र्यांना सांगितले. कामे मार्गी लागण्यासाठी सहसंचालक १५ दिवसातून एक वेळ गडचिरोलीतील कार्यालयात उपलब्ध राहतील.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रUday Samantउदय सामंत