शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

गडचिरोलीत वन विभागच साफ करणार मोहफुलाखालील पालापाचोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:19 AM

मोहफुलाच्या झाडाखालील पालापाचोळा वनविभागच साफ करून देणार आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने हा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देआगीच्या घटनांवर नियंत्रणाचा प्रयत्न ८०० ब्लोअर मशिन खरेदी करणार

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्यात जंगलांना लागणाऱ्या आगीच्या घटनांमागे मोहफूल वेचण्यासाठी पालपाचोळा जळावा म्हणून लावलेला मानवनिर्मिती वणवा कारणीभूत असल्याचे वनविभागाच्या अभ्यासात लक्षात आले. त्यामुळे आता आगी लावून पालापाचोळा जाळण्याऐवजी मोहफुलाच्या झाडाखालील पालापाचोळा वनविभागच साफ करून देणार आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात आणखी ८०० ब्लोअर मशिन खरेदी केल्या जाणार आहेत.गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ७६ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात २ लाख १३ हजार ७१५ मोहाची झाडे आहेत. मोहफुलापासून विविध पदार्थ तयार करता येत असल्याने मोहफुलांना चांगली किंमत मिळते. विशेष म्हणजे, मोहफुलासाठी कोणतेही अतिरिक्त श्रम किंवा गुंतवणूक करावी लागत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात मोहफूल वेचण्याकडे नागरिकांचा कल असतो. मोहफूल जमिनीवर पडत असल्याने ते वेचावे लागतात. त्यासाठी पालापाचोळा साफ करणे गरजेचे असते. प्रत्येक झाडाखालील कचरा साफ करणे शक्य नसल्यामुळे लोक मोहाच्या झाडाखालील कचºयाला आग लावतात. ही आग पुढे जंगलात पसरून त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण होते. यात जंगल व जैवविविधतेचे मोठे नुकसान होते.वन विभागाच्या म्हणण्यानुसार सर्वाधिक आगी मोहफूल वेचण्याच्या उद्देशाने लावण्यात आल्या आहेत. २०१९ मध्ये जंगलातील आगीच्या ११ हजार ७९६ घटनांची नोंद आहे. त्यामध्ये मोहफूल वेचण्यासाठी ६ हजार ७१८ आगी लागल्या आहेत.आगीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी वनविभाग आता ब्लोअर मशिनच्या सहाय्याने मोहफुलाच्या झाडाखालील पालापाचोळा स्वच्छ करून देणार आहे. गडचिरोली वनवृत्त कार्यालयाकडे सध्या ६८२ ब्लोअर मशिन आहेत. यावर्षी पुन्हा ८०० मशिन खरेदी केल्या जाणार आहेत.

झाडाखाली जाळी लावण्याचा प्रयोग फसलाआगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मागील वर्षी वन विभागाने काही गावातील नागरिकांना जाळ्या वितरित केल्या होत्या. या जाळ्या जमिनीपासून जवळपास दोन फूट उंचीवर मोहाच्या झाडाखाली बांधल्या होत्या. दिवसभर पडलेले मोहफूल जाळीत जमा करून गोळा करावे लागत असे. त्यामुळे मोहफूल वेचण्याचीही गरज नव्हती. जाळीत मोहफूल पडल्याने स्वच्छ मोहफूल उपलब्ध होईल, हा सुध्दा उद्देश होता. मात्र बहुतांश नागरिकांनी जाळ्यांचा दुरूपयोग केला. तसेच जाळीमुळे एखाद्या वन्यजीवाचा जीव जाण्याचाही धोका होता. परिणामी जाळी वितरण यावर्षीपासून बंद करण्यात आले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग