शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

३८ वर्षांत गडचिरोली जिल्ह्याला लाभले २४ ‘कलेक्टर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:01 IST

भौगोलिक विस्ताराने मोठा असलेला तेव्हाचा (सन १९८२ पूर्वी) चंद्रपूर जिल्हा हा प्रशासन आणि जनतेच्या सोयीने अत्यंत त्रासदायक आणि न परवडणारा होता. त्यामुळे लोकांकडून आाणि सरकारी पातळीवरसुद्धा जिल्हा विभाजनासाठी जोर सुरू होता. अखेर २६ ऑगस्ट १९८२ या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यामधून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. नवा जिल्हा अस्तित्वात येताच जिल्हास्तरावरील सर्व पदे तयार झाली.

ठळक मुद्देरत्नाकर गायकवाड पहिले जिल्हाधिकारी : ए.डी. काळे यांनी दिली सर्वाधिक काळ सेवा

अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : जिल्हाधिकारी या शब्दापेक्षा ‘कलेक्टर’ हा शब्द सर्वसामान्य लोकांच्या अगदी जवळचा आहे. जिल्ह्याचा बॉस म्हणजे जिल्हाधिकारी अर्थात कलेक्टर हे सर्वसामान्य लोकांना माहीत आहे. आजपासून ३८ वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यासाठी २४ जिल्हाधिकाऱ्यांनी सेवा दिली. त्यात ए.डी. काळे यांनी सर्वाधिक काळ म्हणजे १०९९ दिवस तर महेश आव्हाड यांनी केवळ १४ दिवस कलेक्टर म्हणून काम पाहिले.भौगोलिक विस्ताराने मोठा असलेला तेव्हाचा (सन १९८२ पूर्वी) चंद्रपूर जिल्हा हा प्रशासन आणि जनतेच्या सोयीने अत्यंत त्रासदायक आणि न परवडणारा होता. त्यामुळे लोकांकडून आाणि सरकारी पातळीवरसुद्धा जिल्हा विभाजनासाठी जोर सुरू होता. अखेर २६ ऑगस्ट १९८२ या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यामधून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. नवा जिल्हा अस्तित्वात येताच जिल्हास्तरावरील सर्व पदे तयार झाली. यात जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे सर्वोच्च पद आणि महत्वाचे पद होते. गडचिरोली जिल्ह्याचे प्रथम जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळाला तो रत्नाकर गायकवाड यांना. पुढे रत्नाकर गायकवाड हे राज्याचे मुख्य सचिवसुद्धा झाले होते, हे विशेष!२६ आॅगस्ट १९८२ पासून आजपर्यंत एकूण २४ आय.ए.एस. अधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून काम पाहिले. सध्या यावर्षीच १८ जानेवारीपासून दीपक सिंगला हे २४ वे जिल्हाधिकारीे म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आधी २३ जिल्हाधिकारी सेवा देऊन गेले. त्यामध्ये पंधरावे जिल्हाधिकारी ए.डी. काळे हे सर्वाधिक काळ म्हणजे १०१९ दिवस (३ वर्षे ४ दिवस) तर २१ वे जिल्हाधिकारी महेश आव्हाड अवघे १४ दिवस पदावर कार्यरत होते.गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या आजपर्यंतच्या एकूण २४ जिल्हाधिकाऱ्यांमध्ये फक्त दोघांनी एक हजार दिवस जिल्हाधिकारी म्हणून सेवा कालावधी पूर्ण केला आहे. त्यात ए.डी. काळे आणि रत्नाकर गायकवाड यांचा समावेश आहे. पहिले जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड हे १००१ दिवस आणि विसावे जिल्हाधिकारी रणजित कुमार हे ९६३ दिवस कार्यरत होते. तसेच तेरावे जिल्हाधिकारी आर.ए. राजीव यांचा कार्यकाळ अवघ्या ४२ दिवसांचा होता.अजूनही लाभल्या नाहीत महिला कलेक्टरराज्यातील ३१ वा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. बुधवारी गडचिरोली जिल्हा स्थापनेला ३८ वर्षे पूर्ण झालीत. या ३८ वर्षांत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून २४ आय.ए.एस. अधिकाऱ्यांनी प्रशासीय धुरा सांभाळली. मात्र त्यामध्ये एकाही महिला अधिकाऱ्यांचा समावेश नाही. एकूणच जिल्ह्याला अजूनही महिला कलेक्टरची सेवा लाभण्यासाठी वाट पहावी लागेल.गडचिरोली जिल्ह्यातून शासनाच्या सेवेत अनेक अधिकारी होऊन गेले. पण जिल्हाधिकारी बनून कोणी आजपर्यंत या जिल्ह्यातील व्यक्ती लाभली नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया युवा वर्गातून भविष्यात कोणीतरी आयएएस होऊन आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून रूजू झाल्याचे पाहण्याचे भाग्य येथील नागरिकांना कधी लाभेल, याची प्रतीक्षा सर्वांना आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी