शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

नवोदय विद्यालयासाठी निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

१९८६ मध्ये घोट येथे नवोदय विद्यालयाची स्थापना झाली. निवड परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना या विद्यालयात प्रवेश दिला जातो. त्यामुळे येथील सर्वच विद्यार्थी हुशार राहतात. मात्र सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १९८६ मध्ये विद्यालय भवन, वसतिगृह व काही शिक्षकांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली.

ठळक मुद्देसंडे अँकर । केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांसोबत खासदार अशोक नेते यांची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : घोट येथील नवोदय विद्यालयाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी मनुष्यबळ विकासमंत्री तथा नवोदय विद्यालय समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश पोखरियाल यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.१९८६ मध्ये घोट येथे नवोदय विद्यालयाची स्थापना झाली. निवड परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना या विद्यालयात प्रवेश दिला जातो. त्यामुळे येथील सर्वच विद्यार्थी हुशार राहतात. मात्र सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १९८६ मध्ये विद्यालय भवन, वसतिगृह व काही शिक्षकांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली. ३५ एकर जमीन नवोदय विद्यालयासाठी आरक्षित आहे. मात्र संरक्षण भिंत नसल्याने पाळीव व जंगली जनावरांचा वावर नवोदय विद्यालयाच्या परिसरात राहतो. विशेष म्हणजे, घोट परिसरात जंगल आहे. जंगलातील हिंस्त्र श्वापद विद्यालयाच्या परिसरात येण्याची शक्यता राहते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण राहते. शिक्षकांची पदे सुध्दा रिक्त आहेत. या सर्व समस्या सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री यांच्याकडे केली आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पोखरियाल यांनी दिले.पाणी पिण्याअयोग्यजवाहर नवोदय विद्यालयाच्या भूगर्भातील पाण्यात आर्सेनिक व फ्लोराईड असल्याचे आढळून आले आहे. नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केली असता, सदर पाणी आरोग्यास घातक असल्याचा निष्कर्ष काढला आहे. तरीही विद्यार्थी सदर पाणी पित आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. फ्लोराईडयुक्त पाण्याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात. त्यामुळे या ठिकाणचे पाणी शुध्द करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र शासन या विद्यालयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पालकांकडून होत असल्याची बाब खासदारांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.