शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

नाभिकांचा मोर्चा धडकला

By admin | Updated: August 21, 2014 23:52 IST

राज्यातील नाभिक समाजाच्या समस्या मागील ३० वर्षापासून प्रलंबित आहेत. या समाजातील अनेक नागरिक आजही हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे या समाजाच्या प्रलंबित मागण्या

गडचिरोली : राज्यातील नाभिक समाजाच्या समस्या मागील ३० वर्षापासून प्रलंबित आहेत. या समाजातील अनेक नागरिक आजही हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे या समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरित सोडवाव्या, या मागणीला घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील नाभिक समाजाच्या बांधवांचा मोर्चा गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. त्यानंतर अनेक प्रलंबित मागण्यांचे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले.दिलेल्या निवेदनात नाभिक जातीचा अनुसूचित जातीत समाविष्ट करणे, नाभिक समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, नाभिक समाज बांधवांना अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचे संरक्षण देणे, सलुनसाठी व्यावसायिकांना आरक्षीत जागा उपलब्ध करून देणे, सरकारी जागेत सलुन व्यावसायिकांसाठी जागा आरक्षीत करून देणे, गटई कामगार धर्तीवर सलुन व्यावसायिकांना टपरी योजना मंजूर करावी आदी मागण्यांचा समावेश होता. नाभिक समाजातील बांधव आजही हलाखीचे जीवन जगत आहेत. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात ७ ते ८ हजार मतदार आहेत. शिवाय ५०० ते ६०० सलुन दुकानदार आहेत. नाभिक समाजाचा मेळावा औरंगाबाद येथे मुख्यमंत्री, उपमुख्यंमत्री, समाजकल्याण मंत्र्याच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजातील बांधवांचे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु अजूनपर्यंत नाभिक समाजाच्या समस्या सोडविण्यात आल्या नाही. महाराष्ट्रातील २ लाख सलुन दुकानातून दररोज २० लाखांच्या आसपास गिऱ्हाईक येतात. त्यामुळे नाभिक बांधव एकवटल्यास शासनाला धडा शिकवू शकतात. सरकारने मागील वर्षी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे नाभिक बांधवांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. त्यामुळे नाभिक समाजातील बांधवांच्या समस्या त्वरित सोडवाव्या, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन चालूच राहिल. त्यामुळे नाभिक समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य कराव्या, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदन देतांना महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष नामदेवराव शेंडे, सचिव व्यंकटेश कल्याणमवार, जि. प. सदस्य वर्षा कौशिक, संदीप लांजेवार, दिलीप कौशिक, बाळकृष्ण चोपकर, गोविंद नंदपूरकर, राजू बत्तुल्ला, राम लांजेकर, देविदास फुलबांधे, सुनिल फुलबांधे, वसंत सूर्यवंशी, शालू शेंडे यांच्यासह नाभिक समाजबांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)