शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

नऊ हजार विद्यार्थिनींचा मोफत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

गडचिरोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. यामागील मुख्य कारण शिक्षणाचे प्रमाण कमी हे आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. मानव विकास मिशन अंतर्गत गडचिरोली आगाराला ४९ तर अहेरी आगाराला ४२ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । पाचवी ते बारावीपर्यंत लाभ; मानव विकास मिशन व अहिल्याबाई होळकर बस पास योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मानव विकास मिशन व अहिल्याबाई होळकर योजनंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या सुमारे ९ हजार १५६ विद्यार्थिनी मोफत प्रवासाचा लाभ घेत आहेत.राज्यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. तसेच गळतीचे प्रमाणही अधिक आहे. लहान गावात चवथीपर्यंत तर मोठ्या गावात सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. पाचवी नंतरच्या शाळा मोठ्या गावातच आहेत. दुसऱ्या गावी शाळा असल्याने बहुतांश विद्यार्थिनी चवथीनंतर शाळा सोडत होत्या. मुले सायकलने जात असले तरी मुली सायकलने प्रवास करण्यास धजावत नाही. विद्यार्थिनींना बसने मोफत प्रवास करता यावा यासाठी राज्य शासनाने अहिल्याबाई होळकर मोफत बस पास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत बस पास उपलब्ध करून दिल्या जातात. ही योजना राज्यभरातील विद्यार्थिनींसाठी लागू आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील ४ हजार ९६१ विद्यार्थिंनींना दिला जात आहे.गडचिरोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. यामागील मुख्य कारण शिक्षणाचे प्रमाण कमी हे आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. मानव विकास मिशन अंतर्गत गडचिरोली आगाराला ४९ तर अहेरी आगाराला ४२ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या बसेस विद्यार्थिनींची शाळा ते गाव या दरम्यान शाळा भरणे व सुटण्याच्या वेळेत चालविल्या जातात. मानव विकास मिशनच्या बसमधून जिल्ह्यातील एकूण ४ हजार २४० विद्यार्थिनींची वाहतूक केली जाते. देसाईगंज तालुका वगळता जिल्ह्यातील इतर सर्वच तालुक्यांमध्ये मानव विकास मिशनच्या बसेसची सेवा दिली जाते. बसचा खर्च म्हणून शासन प्रत्येक महिन्याला एका बससाठी ६४ हजार रूपये अनुदान उपलब्ध करून देते.विद्यार्थिनींच्या तुलनेत बसेस अपुऱ्या२०११ मध्ये मानव विकास मिशनच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. मागील आठ वर्षात शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींची संख्या वाढली आहे. त्यामुळे मानव विकास मिशनच्या बसमध्ये विद्यार्थिनींची गर्दी होते. तसेच काही मार्गावर अजुनही बस धावत नाही. अधिकच्या बसेस उपलब्ध झाल्यास नवीन मार्गांवर बसेस चालवून विद्यार्थिनींची वाहतूक करण्यास मदत होईल. शासनाने बसेस उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीstate transportएसटी