वाहतुकीचे नियम पाळा
By Admin | Updated: September 4, 2014 23:48 IST2014-09-04T23:48:37+5:302014-09-04T23:48:37+5:30
वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहनावरील गती नियंत्रित ठेवल्यास कुठलाच अपघात होत नाही. जीवनाचे अमूल्य महत्व ध्यानात ठेवून सर्वांनी वाहन चालवितांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,

वाहतुकीचे नियम पाळा
रस्ता सुरक्षा कार्यशाळा : वाहतूक पोलीस उपनिरीक्षकांचे आवाहन
गडचिरोली : वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहनावरील गती नियंत्रित ठेवल्यास कुठलाच अपघात होत नाही. जीवनाचे अमूल्य महत्व ध्यानात ठेवून सर्वांनी वाहन चालवितांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन गडचिरोली पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी केले.
रस्ता सुरक्षा दशकाच्या निमित्याने येथील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियान मार्गदर्शन कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री होते. पुढे बोलतांना पोलीस उपनिरीक्षक कांबळे म्हणाले, सध्याच्या धावपळीच्या युगातही नागरिकांनी जीवनाचे अमूल्य महत्व विसरू नये, एकदा गेलेले माणसाचे जीवन पुन्हा आयुष्यात परत मिळत नाही. त्यामुळे आयुष्याच्या वाटचालीत धोका होऊ नये म्हणून वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
प्राचार्य डी. जी. म्हशाखेत्री म्हणाले, कोणत्याही गोष्टीवरील नियंत्रणे हे अपघातापूर्वी करता येते. अपघातानंतर नियंत्रण शक्य नाही. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे काळाची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले. प्रास्ताविकेत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एम. जे. मेश्राम यांनी सध्याच्या युगात रस्ता सुरक्षा अभियानाचे नितांत गरज असल्याचे सांगितले. महाविद्यालयीन युवकांनी तसेच युवतींनी वाहन जपून चालवावे, जेणे करून धोका होणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. के. आर. भांडारकर यांनी केले तर आभार कुसराम यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. विलास खुणे, प्रा. जे. जी. उईके, प्रा. एम. के. नक्षीणे, प्रा. आर. एस. कोल्हे, प्रा. ठवरे, प्रा. सुरणकर, प्रा. पी. टी. सहारे आदींसह महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. राकेश करोडकर व रासेयो स्वयंसेवकांनी सहकार्य केले.