शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

जैैविक खतांवर फुलविल्या फळभाज्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:10 AM

ग्रामीण भागातील महिलांचा पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक विकास व्हावा, महिला स्वावलंबी व्हाव्यात या उद्देशाने बचत गटांची स्थापना गावागावांत झाली आहे. बहुतांश बचतगट नाममात्र ठरत आहेत. तर काही बचत गट अनेक व्यवसाय थाटून आर्थिक उन्नती साधत आहेत.

ठळक मुद्देरसायनांचा गंधही नाही : बुर्गीतील बचत गटाच्या महिलांची आर्थिक उन्नतीकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : ग्रामीण भागातील महिलांचा पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक विकास व्हावा, महिला स्वावलंबी व्हाव्यात या उद्देशाने बचत गटांची स्थापना गावागावांत झाली आहे. बहुतांश बचतगट नाममात्र ठरत आहेत. तर काही बचत गट अनेक व्यवसाय थाटून आर्थिक उन्नती साधत आहेत. परंतु एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या बुर्गी येथील बचत गटाने अनोख्या पद्धतीने फळभाजीपाला लागवड व्यवसाय सुरू केला. रासायनिक खतांचा वापर न करता महिलांनी जैविक खतांचा वापर करून फळभाज्यांची बाग फुलविली. यातून त्यांना दरमहा ८ ते १० हजार रुपयांपर्यंत आर्थिक उत्पन्न मिळत आहे.तालुक्यातील बहुतांश गावे ही नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल आहेत. शहरी भागाच्या तुलनेत हा भाग आजही विकासापासून दूर आहे. महिलांना रोजगार मिळत नाही. अशा स्थितीत बुर्गीच्या लक्ष्मी बचत गटाच्या महिलांनी रोजगार निर्मिती व आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी एक पाऊल पुढे टाकले. सुरूवातीला गावातील १० महिलांनी एकत्र येऊन लक्ष्मी बचत गटाची स्थापना केली.बचत गटाची स्थापना तर झाली, मात्र रोजगारासाठी बचत गटाकडे काहीच मार्ग नव्हता. बुर्गीचे उपसरपंच रामा तलांडे यांनी बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन देत त्यांना आपल्या मालकीची जमीन कसण्यासाठी दिली. त्यानंतर महिलांनी माविमच्या माध्यमातून बँकेद्वारा बचत गटास ६० हजाराचे कर्ज मिळविले. या पैशातून महिलांनी मल्चिंग पेपर, पाण्यासाठी पंप मशीन घेतली. जमिनीच्या मशागतीसाठी व इतर बाबींसाठी उपसरपंच रामा तलांडे यांनी मदत केली. या सर्व परिश्रमानंतर फळभाजीपाल्याची बाग महिलांनी तयार केली.भाजीपाला वाढीसाठी रासायनिक खतांचा करताना आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम जाणून बागेतील रोपांच्या वाढीसाठी महिलांनी रासायनिक खतांचा वापर टाळत जैविक खतांचा वापर केला. या खतांच्या माध्यमातून फळभाज्यांची जोमाने वाढ झाली. सध्या या बागेतील भाजीपाला व फळभाज्या निघण्यास सुरूवात झाली आहे. या बागेतून निघालेला भाजीपाला व फळभाज्या महिला बुर्गीच्या आठवडी बाजारात दर बुधवारी विक्रीसाठी ठेवतात. सध्या महिलांना महिन्याकाठी ८ ते १० हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळत आहे.जिल्ह्यात भरपूर महिला बचत गट आहेत. मात्र परिश्रम करून फळभाज्यांची बाग फुलवित आर्थिक भरभराटीकडे वाटचाल करणारा बुर्गीचा लक्ष्मी महिला बचत गट जिल्ह्यातील इतर बचत गटांच्या महिलांसाठी आदर्श ठरत आहे.कामाचे योग्य नियोजन व लेखाजोखाफळभाज्यांच्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नातून महिलांनी काही महिन्यांतच ४२ हजारांचे कर्जसुद्धा फेडले. बागेची योग्य निगा राखली जावी यासाठी बचत गटाच्या दोन महिला आळीपाळीने दररोज बागेत काम करीत असतात. दर रविवारी सदस्यांची बैठक घेतली जाते या बैठकीत हिशेब व लेखाजोखा मांडला जातो. बचत गटातील महिलांच्या आर्थिक उन्नतीत आणखी भर पडावी यासाठी मिनी राईस मिल योजनेच्या माध्यमातून प्राप्त करण्याचा प्रयत्न आहे, असा मानस उपसरपंच रामा तलांडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :vegetableभाज्या