शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कमलापूर परिसरातील वीज समस्या सोडवा

By admin | Updated: September 7, 2016 02:18 IST

अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा ते कमलापूर वीज वाहिनीमध्ये वेळोवेळी बिघाड निर्माण होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

स्वतंत्र लाईनमन देण्याची मागणी : सरपंचांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदनकमलापूर : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा ते कमलापूर वीज वाहिनीमध्ये वेळोवेळी बिघाड निर्माण होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. या परिसरात १५ ते २० गावे येत असल्याने या परिसरासाठी स्वतंत्र लाईनमन नेमण्यात यावा व त्याला कमलापूर येथे राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी कमलापूर परिसरातील सरपंचांनी वीज विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. कमलापूर परिसरातील बहुतांश गावे जंगलांनी व्याप्त आहेत. जंगलातूनच रस्त्याच्या बाजुने विद्युत खांब गाडून गावांना वीज पुरवठा करण्यात आला आहे. मात्र वादळवारा झाल्यानंतर एखादे झाड कोसळून वीज पुरवठा खंडित होतो किंवा झाडांच्या फांद्यांमुळे स्पार्र्किं ग होऊनही वीज पुरवठा खंडित होतो. एकदा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर किमान ४ ते ५ दिवस सुरळीत होत नाही. तेवढे दिवस नागरिकांना अंधारातच काढावे लागते. पावसाळ्यात विजेची समस्या आणखी गंभीर होते. वीज समस्येमुळे कमलापूर परिसरातील ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत. याबाबत वीज विभागाकडे तक्रारही करण्यात आले आहेत. मात्र वीज विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. कमलापूर परिसरातील सरपंचांनी एकत्र येऊन वीज समस्येबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता यांना दिले. त्याचबरोबर या परिसरातील वीज समस्येबाबत चर्चा केली. चर्चेदरम्यान कमलापूर येथे १५ दिवसांतून एकदा शाखा अभियंत्यांना समस्या सोडविण्यासाठी पाठवावे, कमलापूर परिसरासाठी स्वतंत्र लाईनमन द्यावा, विद्युत रोहित्र दुरूस्त करावे आदी मागण्या करण्यात आल्या. कार्यकारी अभियंता ए. एस. परांजपे यांना निवेदन देताना सरपंच रणजीता मडावी यांच्यासह संतोष ताटीकुंडावार, महेश मडावी, संदीप रेपालवार, महेश अडीचेर्लावार, श्रीधर दुग्गीरालापाटी, लक्ष्मीनारायण रापेल्ली, प्रफुल भट, संतोष बोम्मावार यांच्यासह कमलापूर येथील इतरही नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)