शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

‘करकर’ कापणी ऐकली पाच गावांनी, ना पडली ‘त्या’ रक्षकांच्या कानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 05:00 IST

आरमोरी वनपरिक्षेत्राच्या विहीरगावातील एका शेतकऱ्याच्या खसऱ्यावरील ६० सागवान झाडे परवानगीसह तोडली. अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन लाकडावर हॅमर मारला. आता लाकडे नेण्याची वेळ हाेती. तर काय मग जवळपास आठ दिवस दुसऱ्या दोन शेतकऱ्यांच्या शेतातील ९० सागवान झाडे अवैधरित्या ताेडली; परंतु ही झाडे ताेडताना करवताचा ‘करकर’ आवाज परिसराच्या पाच गावात दणाणला.

भीमराव मेश्राम लाेकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : ‘वरातीमागून घाेडे नाचविणे’ ही म्हण वनविभागाच्या बाबतीतही खरी ठरते. सर्व नष्ट झाल्यानंतर कारवाईचे साेंग वन खात्यातील काही अधिकारी व बहुतांश कर्मचारी करतात. मग ते जंगलावरील अतिक्रमण असाे की, अवैध वृक्षताेड. अवैध वृक्षताेडीसंदर्भात आरमाेरी तालुक्याच्या विहीरगावात असाच प्रकार घडला. मशीनद्वारे अवैधरित्या ९० सागवान वृक्षांची ताेड केली. आठ दिवस पाच गावातील लाेकांनी करवताची ‘करकर’ ऐकली; पण जंगलाचे रक्षण करणाऱ्यांच्या कानी का नाही पडली, असा प्रश्न निर्माण हाेत आहे. आरमोरी वनपरिक्षेत्राच्या विहीरगावातील एका शेतकऱ्याच्या खसऱ्यावरील ६० सागवान झाडे परवानगीसह तोडली. अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन लाकडावर हॅमर मारला. आता लाकडे नेण्याची वेळ हाेती. तर काय मग जवळपास आठ दिवस दुसऱ्या दोन शेतकऱ्यांच्या शेतातील ९० सागवान झाडे अवैधरित्या ताेडली; परंतु ही झाडे ताेडताना करवताचा ‘करकर’ आवाज परिसराच्या पाच गावात दणाणला. मग अशावेळी वन विभागातील चौकीदारसह संबंधित वनरक्षक, वनपाल आणि वनाधिकारी यांना या प्रकरणाची भनक लागू नये, याच बाबीने लाेक जीभ चावतात. संबंधित वन कर्मचारी सुट्टीवर होते की, कंत्राटदाराशी हितसंबंध जाेपासून होते. गावांमध्ये बीट गार्ड असताना नागरिकांकडून वनाधिकाऱ्यांना तक्रार येण्याची गरज का भासावी. एका खसऱ्याच्या परवानगीमागे कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तर बहुतेक वेळा जंगलातील झाडे तोडून अधिकृत मालात मिसळून माल सर्रास साॅ-मिलमध्ये विकला जाताे.

मंजुरीसाठी किती कालावधी? खसऱ्यावरील सागवान झाडे तोडण्यासाठी २० प्रकारचे कागदपत्र तयार करावे लागतात. हे कागदपत्र तयार करण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागतो. कधी वर्ष उलटते; पण शेतकऱ्याला स्वतः च्या सातबाऱ्यावर नमूद झाड तोडण्यासाठी परवानगी लवकर मिळत नाही;  मात्र ठेकेदारामार्फत तोडायचे असतील तर परवानगी लवकर मिळते, ही वस्तुस्थिती आहे. 

हा मार्ग तर अगदी साेपा -    शेतकऱ्याच्या शेतातील अवैध सागवानाची तोड झाली तर दंड भरून सदर माल शेतकऱ्यांना दोन महिन्यात परत दिला जातो. सात महिने कागदावर जुळवाजुळव करण्यापेक्षा हा मार्ग ठेकेदारांना अधिक सोपा जातो. -   पाचशे-हजार रुपयाला एक झाड प्रमाणे विकलेल्या शेतकऱ्यांकडे लाखो रुपये दंड भरण्यासाठी खरेच उपलब्ध होतात का? ही गंभीर बाब  आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग