१११ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बंद पडली रेल्वे सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:36+5:30

देसाईगंज हे इंग्रजांच्या कालावधीतही व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाण होते. मालवाहतूक व प्रवाशी वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन गोंदिया-नागभीड नॅरोगेज रेल्वे सेवा १९०८ मध्ये देसाईगंजवरून सुरू केली. त्यानंतर १९१३ मध्ये गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे सेवा सुरू झाली. १९९२ मध्ये गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेचे नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात आले.

For the first time in 111 years' history, the railway service is closed | १११ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बंद पडली रेल्वे सेवा

१११ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बंद पडली रेल्वे सेवा

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : १९०८ मध्ये झाली होती रेल्वे सुरू

पुरूषोत्तम भागडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : व्यावसायिक दृष्ट्या देसाईगंज शहराचे महत्त्व लक्षात घेऊन इंग्रजांनी १९०८ मध्ये गोंदिया-नागभीड रेल्वेसेवा देसाईगंजवरून सुरूवात केली. तेव्हापासून रेल्वे अविरत सुरू होती. या रेल्वेला आता १११ वर्षांचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत पहिल्यांदाच यावर्षी तब्बल २१ दिवसांपासून रेल्वेसेवा बंद आहे. पुढेही काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.
देसाईगंज हे इंग्रजांच्या कालावधीतही व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाण होते. मालवाहतूक व प्रवाशी वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन गोंदिया-नागभीड नॅरोगेज रेल्वे सेवा १९०८ मध्ये देसाईगंजवरून सुरू केली. त्यानंतर १९१३ मध्ये गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे सेवा सुरू झाली. १९९२ मध्ये गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेचे नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात आले. तत्कालीन चांदा जिल्ह्याचे कलेक्टर सी. सी. देसाई यांनी ही रेल्वेसेवा आणण्यात महत्त्वाचे योगदान दिले. जेव्हापासून रेल्वे सेवा सुरू झाली, तेव्हापासून अपवाद वगळता एकही दिवस रेल्वे सेवा थांबली नाही. देखभालीसाठी काही दिवस रेल्वे सेवा थांबविण्यात आली असेल. मात्र लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच प्रवाशी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

वर्दळ ओसरून पसरली शांतता
देसाईगंज येथे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्टेशन आहे. जिल्हाभरातील नागरिक देसाईगंज येथूनच पुढचा रेल्वेचा प्रवास करतात. अगदी शहराला लागून असल्याने या ठिकाणी नेहमीच वर्दळ राहत होती. मात्र लॉकडाऊन झाल्यापासून प्रवाशी रेल्वेसेवा बंद केल्याने येथील वर्दळ ओसरून शांतता पसरली असल्याचे दिसून येते. अधूनमधून मालवाहू रेल्वे सुरू राहतात. मात्र प्रवाशी रेल्वे नसल्याने वर्दळ राहत नाही.

Web Title: For the first time in 111 years' history, the railway service is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे