शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वाढीव मानधनासाठी आर्थिक तरतूद

By admin | Updated: September 26, 2015 01:35 IST

२२ सप्टेंबर रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार २०१५-१६ च्या वाढीव मानधनासाठी तसेच २०१४-१५ व २०१५-१६ ....

एरिअर्सची प्रतीक्षाच : दोन वर्षांची भाऊबीज भेट देणारगडचिरोली : २२ सप्टेंबर रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार २०१५-१६ च्या वाढीव मानधनासाठी तसेच २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षांची भाऊबीज भेट देण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. एप्रिल २०१४ पासूनचे वाढीव वेतन एरिअर्सच्या रूपात देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र सदर एरिअर्सबाबत शासनाने अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याने अंगणवाडी सेविकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. अंगणवाडी सेविकांना राज्य शासन एक हजार रूपये व केंद्राचे तीन हजार रूपये असे एकूण चार हजार रूपये मानधन दिले जात आहे. अंगणवाडी मदतनीसांना राज्य शासन ७०० व केंद्र शासन १ हजार ५०० रूपये असे एकूण २ हजार २०० रूपये तर मिनी अंगणवाडी सेविकांना राज्य शासन ४०० व केंद्र शासन १ हजार ५०० असे एकूण २ हजार ५०० रूपये मानधन सध्य:स्थितीत देत आहे. वाढलेल्या महागामध्ये सदर मानधन अत्यंत तुटपुंजे असल्याने मानधनात वाढ करावी, यासाठी अंगणवाडी सेविकांनी लढा उभारला होता. अनेक आंदोलने केल्यानंतर यापूर्वीच्या आघाडी शासनाने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ९५० रूपये व अंगणवाडी मदतनीसाच्या मानधनात ५०० रूपये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लगेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने वाढीव मानधनाची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर सत्तेत आलेल्या युती शासनाने हातवर करीत वाढीव मानधनाचा निर्णय यापूर्वीच्या शासनाने घेतला आहे. त्यामुळे आपण एप्रिल २०१४ पासून नाही तर एप्रिल २०१५ पासून वाढीव मानधन देऊ, असा निर्णय घेतला. त्याविरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तीव्र लढा उभारला. अखेर शासनाने नमते घेत एप्रिल २०१४ पासून वाढीव मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. २२ सप्टेंबर रोजी शासनाने निर्णय घेतला असून या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना २०१५-१६ या वर्षाचे वाढीव मानधन देणे, त्याचबरोबर २०१४-१५ व २०१५-१६ ची भाऊबिज भेट देण्यासाठी १५९ कोटी ८९ लाख १० हजार रूपयांची तरतूद केली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट म्हणून दरवर्षी शासन हजार रूपये बोनस देते. मात्र मागील वर्षी भाऊबीज भेट दिली नव्हती. यावर्षी मात्र दोन्ही वर्षांची मिळून भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन निर्णयामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एप्रिल २०१५ पासूनचे वाढीव मानधन मिळेल. मात्र २०१४-१५ च्या मानधनासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. सदर मानधनासाठी तत्काळ तरतूद करावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. (नगर प्रतिनिधी)