शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

अखेर कोरची-कोटगूल मार्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 5:00 AM

कोरची-कोटगूल हा ३० किमी अंतराचा मार्ग आहे. या मार्गावर ग्रामीण भागातील बहुतांश गावे येतात. सदर मार्गावर छत्तीसगड राज्यातील पाटण, बंजारी, भुरकुंडी आदी गावे पडतात. सदर गावातील नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने याचा प्रसार होऊ नये म्हणून रस्त्यावर झाडे टाकून २५ मार्चपासून रस्ता अडविला होता.

ठळक मुद्देयंत्रणा पोहोचली : छत्तीसगड राज्याने सीमांवर चेकपोस्ट बसवून केली होती नाकेबंदी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी छत्तीसगड राज्याने कोरची-कोटगूल मार्गावर सीमांवर चेक पोस्ट बसवून नाकेबंदी केली. तसेच नागरिकांनी झाडे टाकून हा मार्ग बंद केला होता. मार्ग बंद झाल्याने परिसरातील नागरिकांची अडचण वाढली होती. याबाबत लोकमने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाला जागे केले होते. अखेर छत्तीसगड व महाराष्टÑ या दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सदर मार्गावरील झाडे जेसीबीच्या सहाय्याने हटवून हा मार्ग पूर्ववत सुरू करण्यात आला.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ मार्च ते १४ एप्रिल अशा एकूण २१ दिवसांपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. कोरची-कोटगूल हा ३० किमी अंतराचा मार्ग आहे. या मार्गावर ग्रामीण भागातील बहुतांश गावे येतात. सदर मार्गावर छत्तीसगड राज्यातील पाटण, बंजारी, भुरकुंडी आदी गावे पडतात. सदर गावातील नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने याचा प्रसार होऊ नये म्हणून रस्त्यावर झाडे टाकून २५ मार्चपासून रस्ता अडविला होता. परिणामी कोटगूल भागातील नागरिकांना अत्यावश्यक सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत होते.या संदर्भात लोकमतने ३ एप्रिलला ‘छत्तीसगडच्या सीमा बंदीचा कोरची तालुक्यातील गावांना फटका’ या मथड्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत छत्तीसगडच्या प्रशासनाला कळविले. राजनांदगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जयप्रकाश मोर्य यांच्या आदेशानुसार ५ एप्रिल रोजी रविवारला उपविभागीय अधिकारी सी. जी. बघेल, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश कांबळे, मोहलाचे तहसीलदार ठाकूर, चिल्हाटीचे पोलीस निरीक्षक नासीर भट्टी, कोरचीचे तहसीलदार सी. आर. भंडारी, नायब तहसीलदार बी. आर. नारनवरे, पुरवठा निरीक्षक नरेश सिडाम, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सद्दीन भामानी आदींनी प्रत्यक्ष रस्ता अडविलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. कापलेली झाडे रस्त्यावर टाकून रस्ता अडविण्यात आल्याचे दिसून आले.छत्तीसगड व महाराष्टÑ या दोन्ही राज्याच्या अधिकाºयांनी मिळून गावातील नागरिकांच्या सहकार्यातून जेसीबीच्या सहाय्याने या मार्गावर टाकलेले झाडे हटविण्यात आले. कोरची-कोटगूल मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. बंजारी, वासडी येथील नागरिकांनी झाडे सरकविण्यास मदत केली. सदर झाडे सरविण्यास एक तास लागला.१० दिवसानंतर मार्ग सुरूकोरची-कोटगूल मार्ग बंद असल्याने सीमांवरील गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. झाडे टाकून मार्ग बंद केल्याने नागरिक त्रस्त झाले होते. तब्बल दहा दिवस सदर मार्ग बंद होता. परिणामी याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले. प्रशासन सर्तक होऊन मार्गावरील झाडे हटवून मार्ग सुरू करण्यात आला. दहा दिवसानंतर मार्ग सुरू झाल्याने नागरिकांनी लोकमतचे आभार मानले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTrafficवाहतूक कोंडी