शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 5:00 AM

आकस्मिक स्थितीत पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने पीक विमा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याला पीक विमा काढणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे सर्वच पीक कर्जदार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. पूर्वीच्या तुलनेत विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्देनुकसान होऊनही भरपाईपासून वंचित : मानापूर परिसरातील शेतकरी वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : दिवाळीच्या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे मानापूर, देलनवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. मात्र एकाही शेतकऱ्याला विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे विम्यावरचा विश्वास उडायला लागला आहे.आकस्मिक स्थितीत पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने पीक विमा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याला पीक विमा काढणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे सर्वच पीक कर्जदार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. पूर्वीच्या तुलनेत विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शेतीचे नुकसान झाल्यानंतर मदत नुकसानभरपाई मिळेल, याच उद्देशाने शेतकऱ्यांनी पीक विमे काढले आहेत. नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन अधिकारी वर्गाकडून दिले जाते. मात्र प्रत्यक्षात कोणताच लाभ मिळत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. शासन व विमा कंपन्या शेतकऱ्यांची लूट करीत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.जड धान पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर असताना तसेच हलके धान कापून झाले असताना पावसाने हजेरी लावली. मानापूर, देलनवाडी परिसराला १५ दिवस पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे हलक्या धानाच्या कडपा पाण्यात भिजल्या. तर जमिनीवर कोसळले. परिणामी दोन्ही प्रकारच्या धानाचे मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांना तर ५० टक्क्याहून कमी उत्पादन झाले. पाण्यात भिजलेले धान व्यापारी खरेदी करण्यास तयार नाहीत. काही शेतकऱ्यांचा तर लागवडीचा खर्च सुद्धा निघाला नाही. अशी बिकट परिस्थिती असतानाही मानापूर परिसरातील एकाही शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी महादेव मेश्राम, नामदेव किरंगे, बाजीराव पदा, दशरथ रणदिवे, बालाजी पेंदाम, राजेंद्र दशरथ, नामदेव सोनुले, शेषराव मेश्राम, अशोक किरंगे यांनी केली आहे.विमा मिळण्यासाठी शासनाच्या आदेशाची गरज काय?शेतकºयांनी पैसे भरून पिकाचा विमा काढला आहे. पिकाचे नुकसान झाल्याने नुकसानभरपाई देणे हे कंपनीचे कर्तव्य आहे. याबाबत काही शेतकºयांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, शासनाचे आदेश प्राप्त झाले नाही, असे उत्तर दिले आहे. विम्याचे पैसे शासनाने दिले नसून शेतकऱ्यांनी भरले आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाच्या आदेशाची गरज काय, असा प्रश्न शेतकºयांनी केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी