कलवट तुटल्याने शेतकऱ्यांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:01:29+5:30
शंकरनगर ग्रामपंचायत अंतर्गत सालेमाराकडे जाणाºया मार्गाचे रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधकाम केले आहे. याच मार्गावर असलेला कलवट पावसामुळे तुटून पडला आहे. तसेच पाणी वाहण्याची क्षमता लक्षात न घेता लहान आकाराचा कलवट बांधण्यात आला. त्यामुळे बाजूने पाणी वाहत असल्याने कलवटाच्या बाजूला खोलगट भाग निर्माण झाला आहे.

कलवट तुटल्याने शेतकऱ्यांची अडचण
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पांदण रस्त्यावर पाच वर्षांपूर्वी कलवटाचे बांधकाम केले. मात्र सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने मागील वर्षीच्या पावसाळ्यात सदर कलवट कोसळले. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाºया शेतकºयांची अडचण झाली आहे. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
शंकरनगर ग्रामपंचायत अंतर्गत सालेमाराकडे जाणाºया मार्गाचे रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधकाम केले आहे. याच मार्गावर असलेला कलवट पावसामुळे तुटून पडला आहे. तसेच पाणी वाहण्याची क्षमता लक्षात न घेता लहान आकाराचा कलवट बांधण्यात आला. त्यामुळे बाजूने पाणी वाहत असल्याने कलवटाच्या बाजूला खोलगट भाग निर्माण झाला आहे. जमीन व कलवट यांच्यामध्ये खोलगट भाग असल्याने या कलवटावरून बैलबंडी नेणे अशक्य होते. बाजूला असलेल्या रस्त्याने दुचाकीस्वार व पायदान नागरिक प्रवास करतात. शंकरनगर येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. सदर शेतकरी याच मार्गाने वैरागड, कढोली, वडधा, अमिर्झा येथे भाजीपाला विक्रीसाठी येतात. मात्र कलवट नसल्याने शेतकºयांची पंचाईत झाली आहे. पावसाळ्यात सदर मार्ग पूर्णत: बंद होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कलवटाचे काम नव्याने करावे, अशी मागणी केली आहे.