शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 11:38 PM

आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत मालेवाडा केंद्रावर मागील दोन महिन्यांपासून धान खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र शेतकऱ्यांचे चुकारे वेळेवर होत नसल्याने चुकाºयांसाठी शेतकºयांची पायपीट वाढली आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून कारभार ठप्प : मालेवाडा केंद्रावर सव्वा कोटींचे चुकारे थकले

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत मालेवाडा केंद्रावर मागील दोन महिन्यांपासून धान खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र शेतकऱ्यांचे चुकारे वेळेवर होत नसल्याने चुकाºयांसाठी शेतकºयांची पायपीट वाढली आहे.तालुक्यातील मालेवाडा परिसर धान व मिरची पिकाकरिता प्रसिद्ध आहे. दिवसेंदिवस मिरचीची लागवड परवडत नसल्याने अनेक शेतकरी धान पिकाकडे वळले आहेत. या परिसरात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने बहुतांश शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्रावरच धानाची विक्री करतात. धानासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी शेतकरी धान निघाल्याबरोबर धानाची विक्री करण्याची लगबग सुरू करतात. धान खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून या केंद्रावर मागील दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल सव्वा कोटी रूपयांच्या धानाची विक्री झाली आहे. मात्र एकाही शेतकऱ्याला अजूनपर्यंत धानाचे चुकारे मिळाले नाही. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे थकले आहेत. चुकारे कधी मिळणार, याबाबत महामंडळाच्या अधिकाºयांना तसेच आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना शेतकरी वेळोवेळी विचारणा करीत आहेत. मात्र समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. आॅनलाईन पद्धतीमध्ये धानाचा काटा झाल्यापासून तीन दिवसात शेतकºयांच्या खात्यात चुकाºयाची रक्कम जमा होईल, असे आश्वासन आदिवासी विकास महामंडळ व शासनाने दिले होते. मात्र दीड महिन्यांचा कालावधी उलटूनही चुकारे मिळाले नाहीत. अनेक केंद्रांवर पुरेशा प्रमाणात बारदाना उपलब्ध नाही. बारदाना आणाल तरच धानाची खरेदी केली जाईल, असे अडेलतट्टू धोरण आदिवासी विकास महामंडळाने अवलंबिले आहे. बारदान्याची खुल्या बाजारात २५ ते ३० रूपये असताना शेतकऱ्यांना केवळ २० रूपये दिले जात आहेत. प्रत्येक पोत्यामागे जवळपास १० रूपयांचे नुकसान शेतकºयांना सहन करावा लागत आहे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान भिजले. याचेही नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले आहे. शेतकऱ्यांना तत्काळ चुकारे देण्यात यावे, अशी मागणी मालेवाडा येथील शेतकरी कपील पेंदाम, राकेश नागोसे, सुखदेव उईके, नीलकंठ उईके, विनायक नैताम, महारू वाटगुरे, पुरूषोत्तम पेंदाम, गणपत नागोसे या शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.पलसगड केंद्रावर ३ हजार १०० क्विंटल धान खरेदीकुरखेडा तालुक्यातील पलसगड येथील आधारभूत धान खरेदी केंद्र १३ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आले. आतापर्यंत या केंद्रावर ३ हजार १०० क्विंटल धान खरेदी करण्यात आले. परंतु अजूनपर्यंत या केंद्रावरील शेतकऱ्यांचे चुकारे झाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. केंद्राचे व्यवस्थापक ठलाल यांना विचारणा केली असता, सर्व शेतकऱ्यांची यादी कुरखेडा येथील उपप्रादेशिक कार्यालयात पाठविली आहे, अशी माहिती दिली. मात्र अजूनपर्यंत चुकारे झाले नाही. ३ हजार १०० क्विंटल धानाचे ५४ लाख २५ हजार रूपये एवढी किंमत होते. मात्र एकाही शेतकऱ्याला पैसे देण्यात आले नाही. शेतकऱ्यांचे चुकारे तत्काळ द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही लक्ष देणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी