संचारबंदीच्या काळातही आठ हजार पॉझिटिव्ह, रुग्ण कमी होण्याऐवजी वाढले।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST2021-05-05T05:00:29+5:302021-05-05T05:00:29+5:30

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली - प्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी घालून दिलेल्या विविध नियमांची सामाजिक जबाबदारी समजून अंमलबजावणी करण्याकडे केलेला ...

Even during the curfew, the number of patients increased by 8,000 instead of decreasing. | संचारबंदीच्या काळातही आठ हजार पॉझिटिव्ह, रुग्ण कमी होण्याऐवजी वाढले।

संचारबंदीच्या काळातही आठ हजार पॉझिटिव्ह, रुग्ण कमी होण्याऐवजी वाढले।

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली

- प्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी घालून दिलेल्या विविध नियमांची सामाजिक जबाबदारी समजून अंमलबजावणी करण्याकडे केलेला कानाडोळा.

- सार्वजनिक कार्यक्रमातून होणारे एकत्रीकरण, लग्नासारखे कार्यक्रम पुढे ढकलण्याऐवजी नियम मोडून उत्साहाने पार पाडणे.

- ताप किंवा इतर लक्षणांकडे दुर्लक्ष करून वेळीच कोरोना चाचणी करण्यासाठी केलेली टाळाटाळ. यामुळे योग्य उपचारास विलंब होऊन रुग्ण गंभीर झाले.

ग्रामीण भागात रुग्ण वाढले, कारण?

- लसीकरणाला गांभीर्याने न घेणे, त्याबाबत मनात शंका-कुशंका ठेवण्यामुळे लस उपलब्ध असतानाही ती घेण्यास टाळाटाळ करणे.

- गेल्यावर्षी ज्या पद्धतीने गावकरी स्वत:च संचारबंदीची कडक अंमलबजावणी करत बाहेरच्या व्यक्तीला गावात प्रवेश नाकारत होते. ती पद्धत यावर्षी दिसली नाही.

- कोरोनाचे नियम न पाळता सार्वजनिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होणे, त्यातून संसर्ग पसरणे.

(फोटो कॅप्शन- गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी दिवसभर अशी रांग असते.)

Web Title: Even during the curfew, the number of patients increased by 8,000 instead of decreasing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.