शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

पालिका निर्मितीच्या ५९ वर्षांनंतरही बसस्थानकाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:09 IST

देसाईगंज : जिल्ह्यातील एक प्रगत व विकसित तालुका अशी ओळख असलेल्या देसाईगंज तालुक्याच्या निर्मितीला तब्बल ५९ वर्षांचा कालावधी उलटला ...

देसाईगंज : जिल्ह्यातील एक प्रगत व विकसित तालुका अशी ओळख असलेल्या देसाईगंज तालुक्याच्या निर्मितीला तब्बल ५९ वर्षांचा कालावधी उलटला आहे. नगरपालिका तयार होऊन तब्बल ५९ वर्ष झाली तरी अजूनही येथे बसस्थानक होऊ शकलेले नाही. आमदार क्रिष्णा गजबे यांनी आरमोरी मार्गावरील बसस्थानकाच्या जागेवर गतवर्षी भूमिपूजन केले. मात्र, अद्याप तरी त्या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम सुरू झालेले नाही. याठिकाणी आवार नसलेल्या छोटयाशा बसस्थानकातूनच कारभार सुरू आहे.

देसाईगंज शहरात १ मे १९६१ला नगर परिषदेची स्थापना झाली. अखंडित अशा चंद्रपूर जिल्हय़ातील ही नगर परिषद नावाजलेली होती. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्यातील देसाईगंज शहराला १९९२ साली तालुक्याचा दर्जा मिळावा, यासाठीही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. देसाईगंज शहर हे वेळोवेळी राजकीय अनास्थेला बळी पडले आहे. येथे विकासातील अनेक राजकीय अडसर दूर करून विकास करावा लागत आहे. येथील बसस्थानकाची समस्याही यापैकीच एक आहे.

गडचिरोली जिल्हयातील मध्यवर्ती औद्योगिक शहर म्हणून देसाईगंज शहराला ओळखले जाते. जिल्हयातील एकमेव रेल्वेस्थानक याच शहरात आहे. मात्र, या शहरात ३५ वर्षांपूर्वी बांधलेले आवार नसलेले छोटेसे बसस्थानक आहे. शहरातून कुरखेडा, ब्रह्मपुरी, नागपूर, चंद्रपूर, साकोली, गडचिरोली, लाखांदूर, राजुरा यासह संपूर्ण राज्यात धावणाऱ्या बसेस आहेत. पूर्वीपेक्षा शहरातील लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता, येथे बसस्थानक गरजेचे आहे. येथील बसस्थानकाच्या मागणीकडे जातीने लक्ष देऊन आमदार क्रिष्णा गजबे यांनी त्यासाठी प्रयत्न करून विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आरमोरी मार्गावरील बसस्थानकाच्या जागेवर भूमिपूजन केले. या भूमिपूजनामुळे शहरवासियांच्या बसस्थानक बांधकामाच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, दोन वर्षानंतर अद्यापही या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झालेली नाही. शासनाने येथील बसस्थानकाच्या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.