शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

गावस्तरावर पोहोचल्या जीवनावश्यक वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 6:00 AM

कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर संचारबंदी करण्यात आल्याने या सर्व लोकांचा रोजगार हिरावला आहे. परिणामी व्यवसायही ठप्प झाला आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे अडकून पडलेल्या गरजू कुटुंबांना १५ ते २० दिवस पुरेल एवढे तांदूूळ, गव्हाचे पीठ, डाळ, बेसनाचे पॉकेट, खाद्य तेल, साखर, तिखट पॉकेट, मीठ पॉकेट व हळद पॉकेट आदी साहित्य दिले जात आहेत.

ठळक मुद्देगरजू लोकांना वाटप : संचारबंदीमुळे अडकून पडलेल्या गरजू व्यक्तींना प्रशासनाकडून दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने संचारबंदी करण्यात आली असून याची अंमलबजावणी प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. त्याअनुषंगाने शासनाच्या वतीने तालुका प्रशासनामार्फत जिल्हाबाहेरील येथे अडकून पडलेल्या गरजू नागरिकांसाठी गावपातळीवर अन्नधान्य व आवश्यक वस्तू पोहोचविल्या जात आहेत.चामोर्शीचे तहसीलदार संजय गंगथडे यांच्या सूचनेनुसार तालुक्याच्या भेंडाळा परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली. अनेक लोक तसेच मजूर रोजगारासाठी गडचिरोली जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून आले आहे. चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मागील काही दिवसांपासून बरेच नागरिक कामानिमित्त वास्तव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर संचारबंदी करण्यात आल्याने या सर्व लोकांचा रोजगार हिरावला आहे. परिणामी व्यवसायही ठप्प झाला आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे अडकून पडलेल्या गरजू कुटुंबांना १५ ते २० दिवस पुरेल एवढे तांदूूळ, गव्हाचे पीठ, डाळ, बेसनाचे पॉकेट, खाद्य तेल, साखर, तिखट पॉकेट, मीठ पॉकेट व हळद पॉकेट आदी साहित्य दिले जात आहेत. साहित्य वितरित करताना भेंडाळाचे पोलीस पाटील श्रीरंग म्हशाखेत्री, महसूल विभागाचे निरीक्षक फुलझेले, कोतवाल मोरेश्वर साखरे यांच्यासह भेंडाळा व वाघोली साजाचे तलाठी उपस्थित होते. जि.प. शिक्षकांनी सहकार्य केले.न.प.उपाध्यक्षांकडून ४०० कुटुंबांना हॅन्डवॉशचे वाटपचामोर्शी- शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, या सामाजिक दायित्वाच्या भावनेतून चामोर्शी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहुल नैताम व त्यांचे मोठे बंधू निशांत नैताम यांनी त्यांच्या वॉर्ड क्र. ११ मधील २२० कुटुंबांना तसेच वॉर्ड क्र.२ मधील १८० अशा एकूण ४०० कुटुंबांना हॅॅन्डवॉशचे वितरण करण्यात आले. बंदोबस्ताच्या कर्तव्यावर असलेल्या ५० पोलीस कर्मचाऱ्यांना हॅन्डवॉश प्रदान करण्यात आले.तालुक्यात कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती नसल्या तरी बाहेर गावावरून जसे पुणे, मुंबई, नागपूर येथून आलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण केल्यानंतर २६ मार्च २०२० पर्यंत १ हजार ६१ व्यक्तींना गृह विलगिकरण करून ठेवण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार संजय गंगथडे यांनी दिली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocialसामाजिक