शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सिंचनाचा दुष्काळ संपवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:59 IST

गडचिरोली जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. सुमारे २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड केली जाते. मात्र जेमतेम २६ हजार हेक्टरवरच सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देजनतेच्या जिव्हाळ््याच्या विषयाचा लोकमतने घेतलेला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. सुमारे २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड केली जाते. मात्र जेमतेम २६ हजार हेक्टरवरच सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. एकूण शेत जमिनीच्या केवळ १० टक्के क्षेत्रावर सिंचन आहे. सिंचनाच्या सुविधा वाढविण्यासाठी आमच्याकडून अनेक वर्षांपासून मागणी होत असली तरी त्याकडे फारसे लक्ष दिले जात आहे. आता ३-४ वर्षात सिंचन विहीरी दिल्याने थोडा दिलासा मिळाला, अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिली.उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. यामुळे संपूर्ण अर्थकारण शेतीवरच आधारित आहे. येथील वातावरण व जमीन धान पिकासाठी अनुकूल असल्याने धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे धान पिकाला अगदी सुरूवातीपासून तर शेवटपर्यंत पाणी द्यावे लागते. त्यामुळे हातची सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. परिणामी पावसाच्या भरवशावरच शेती केली जाते.पावसाने दगा दिल्यास पीक करपताना बघावे लागते. बºयाचवेळा उत्पादन खर्चही निघत नाही. सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन निवडून येणाºया प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून दिले जाते. मात्र ज्या प्रमाणात सिंचनाचे क्षेत्र वाढायला पाहिजे ते वाढत नाही. आधुनिक तंत्रज्ञान व सुशिक्षित झालेला शेतकरी आपल्या शेतात अनेक प्रयोग करून शेती करू इच्छितो. पण सिंचनच उपलब्ध नसेल तर शेती करणार तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. गावात रस्ते, नाली बांधण्याऐवजी तोच निधी प्राधान्याने सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास येथील शेतकºयांची स्थिती सुधारण्यास मदत होईल.जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. त्यावर बंधाऱ्यांचे बांधकाम होणे आवश्यक आहे. मात्र बंधारे बांधल्या गेले नाही. काही बंधाऱ्यांचे बांधकाम अपुरे आहे. तर काही बंधारे निकृष्ट दर्जाचे बांधल्याने ते पहिल्याच पाण्यात वाहून गेले आहेत. शेततळे हे केवळ शासनाचे सोंग आहे. उन्हाळयात शेततळ्यांमध्ये पाणी राहत नाही. कर्जमाफी हा तोडगा नाही तर सिंचन सुविधा हाच खरा उपाय आहे.- जगन्नाथ बोरकुटे, जि. प. सदस्य.आपले पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यामुळे कृषीमध्ये येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे सुमारे १५ एकर शेती आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करणे शक्य सुद्धा आहे. मात्र सिंचनाची सुविधा नाही. परिणामी सर्वच मार्ग बंद झाले आहेत. चिचडोह बॅरेजप्रमाणे इतरही नद्यांवर बंधारे झाल्यास बारमाही सिंचनाची सुविधा होईल. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.- दीपक धोटे, देसाईगंज

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प