शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

सिंचनाचा दुष्काळ संपवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:59 IST

गडचिरोली जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. सुमारे २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड केली जाते. मात्र जेमतेम २६ हजार हेक्टरवरच सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देजनतेच्या जिव्हाळ््याच्या विषयाचा लोकमतने घेतलेला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. सुमारे २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड केली जाते. मात्र जेमतेम २६ हजार हेक्टरवरच सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. एकूण शेत जमिनीच्या केवळ १० टक्के क्षेत्रावर सिंचन आहे. सिंचनाच्या सुविधा वाढविण्यासाठी आमच्याकडून अनेक वर्षांपासून मागणी होत असली तरी त्याकडे फारसे लक्ष दिले जात आहे. आता ३-४ वर्षात सिंचन विहीरी दिल्याने थोडा दिलासा मिळाला, अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिली.उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. यामुळे संपूर्ण अर्थकारण शेतीवरच आधारित आहे. येथील वातावरण व जमीन धान पिकासाठी अनुकूल असल्याने धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे धान पिकाला अगदी सुरूवातीपासून तर शेवटपर्यंत पाणी द्यावे लागते. त्यामुळे हातची सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. परिणामी पावसाच्या भरवशावरच शेती केली जाते.पावसाने दगा दिल्यास पीक करपताना बघावे लागते. बºयाचवेळा उत्पादन खर्चही निघत नाही. सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन निवडून येणाºया प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून दिले जाते. मात्र ज्या प्रमाणात सिंचनाचे क्षेत्र वाढायला पाहिजे ते वाढत नाही. आधुनिक तंत्रज्ञान व सुशिक्षित झालेला शेतकरी आपल्या शेतात अनेक प्रयोग करून शेती करू इच्छितो. पण सिंचनच उपलब्ध नसेल तर शेती करणार तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. गावात रस्ते, नाली बांधण्याऐवजी तोच निधी प्राधान्याने सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास येथील शेतकºयांची स्थिती सुधारण्यास मदत होईल.जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. त्यावर बंधाऱ्यांचे बांधकाम होणे आवश्यक आहे. मात्र बंधारे बांधल्या गेले नाही. काही बंधाऱ्यांचे बांधकाम अपुरे आहे. तर काही बंधारे निकृष्ट दर्जाचे बांधल्याने ते पहिल्याच पाण्यात वाहून गेले आहेत. शेततळे हे केवळ शासनाचे सोंग आहे. उन्हाळयात शेततळ्यांमध्ये पाणी राहत नाही. कर्जमाफी हा तोडगा नाही तर सिंचन सुविधा हाच खरा उपाय आहे.- जगन्नाथ बोरकुटे, जि. प. सदस्य.आपले पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यामुळे कृषीमध्ये येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे सुमारे १५ एकर शेती आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करणे शक्य सुद्धा आहे. मात्र सिंचनाची सुविधा नाही. परिणामी सर्वच मार्ग बंद झाले आहेत. चिचडोह बॅरेजप्रमाणे इतरही नद्यांवर बंधारे झाल्यास बारमाही सिंचनाची सुविधा होईल. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.- दीपक धोटे, देसाईगंज

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प