शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

आठ दिवसांचा अवधी संपला; विद्यापीठाच्या समस्या कायमच

By admin | Updated: August 20, 2014 23:31 IST

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ सुरू करण्यात आले. परंतु या विद्यापीठाच्या अ‍ॅकाडमीक कमिट्या स्थापन करण्यात आलेल्या नाही.

गडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ सुरू करण्यात आले. परंतु या विद्यापीठाच्या अ‍ॅकाडमीक कमिट्या स्थापन करण्यात आलेल्या नाही. तसेच कुलगुरूचे रिक्त पदही भरण्यात आलेले नाही. आठ दिवसाच्या आत गोंडवाना विद्यापीठाच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले होते. हे आश्वासन हवेत विरले आहे व गोंडवाना विद्यापीठ दररोज विविध समस्यांचा सामना करीत आहे. २०११ मध्ये गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले. विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर विद्वत्त व व्यवस्थापन समित्यांसह अन्य समित्या स्थापन होणे आवश्यक होते. या समित्यांच्या माध्यमातून विद्यापीठात अभ्यासक्रम निश्चिती तसेच अन्य प्रशासकीय काम पार पाडले जातात. याबाबत राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे प्रस्तावही सादर करण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून या प्रस्तावावर काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे एकही समिती स्थापन झालेली नाही. त्यातच मार्च महिन्यात गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार सेवानिवृत्त झालेत. त्यांच्या जागीही नवा कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया रखडलेली आहे. या समित्या नसल्याने विद्यापीठातील प्राध्यापकांची भरतीही तांत्रिक अडचणीत सापडून रखडलेली आहे. अलिकडेच १२ आॅगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गडचिरोली आले असताना त्यांना या संदर्भात विचारणा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यांच्या समक्ष गोंडवाना विद्यापीठाच्या समस्या आठ दिवसात निकाली काढू, असे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप एकही प्रश्न निकाली निघालेला नाही. गोंडवाना विद्यापीठाला वनविभागाकडून जमिनही मिळालेली नाही. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासात मोठा अडचण निर्माण झाला आहे व राज्य सरकार गोंडवाना विद्यापीठाच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष करीत आहे, असा संदेश सर्वसामान्यांमध्ये गेला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)