शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

ई-श्रमची नोंदणी केली मात्र लाभाचे काय? दिला जातोय केवळ विम्याचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:24 IST

तीन वर्षे उलटली : नेमका उद्देश नागरिकांना कळेना

दिगांबर जवादे लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : असंघटित क्षेत्रातील कामगारांची माहिती केंद्र शासनाला मिळावी. त्यानुसार योजना आखता येईल यासाठी ई-श्रम कार्ड नोंदणी केली जात आहे. जिल्ह्यात ३ लाख २० हजार ७५८ नागरिकांनी नोंदणी केली आहे. मात्र जवळपास तीन वर्षांचा कालावधी उलटूनही एकाही नोंदणीधारकाला कोणत्याच योजनेचा लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे नोंदणीचा फायदा काय? असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

शासनाच्या सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांसह विमा योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशाने शासनाने असंघटित क्षेत्रातील कामगारांचा डेटाबेस तयार करण्याच्या उद्देशाने ऑगस्ट २०२१ पासून ई-श्रम पोर्टलवर नोंदणी सुरू केली आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळेल या आशेने जिल्ह्यातील शेतीशी संबंधित, बांधकाम, घरकाम, चर्मोद्योग क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, ऑटोमोबाइल, शिवणकाम आदी क्षेत्रातील कामगारांनी नोंदणी केली आहे. 

ई-श्रम नोंदणीसाठी अशी लागणार पात्रता 

  • ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी असंघटित क्षेत्रातील कामगार आयकर भरणारा नसावा. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा. 
  • शासनाने निश्चित केलेल्या ३०० उद्योगांतील असंघटित कामगार असावा तसेच आधारकार्ड, बँक पासबुक, आधारकार्डशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दोन लाखांचा विमा मिळणार या योजनेचा सध्या एकच लाभ दिला जात आहे. तो म्हणजे ज्यांनी नोंदणी केली आहे. त्या असंघटित कामगारांचा मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आले तर २ लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांचा विमा लागू आहे.

योजनेसाठी कोणाला नोंदणी करता येणार? विविध ३०० क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम कार्डसाठी नोंदणी करता येते. यात ऊसतोड कामगार, सुतारकाम करणारी व्यक्ती, बांधकाम कामगार, शेतीकाम करणारे, घरकाम करणाऱ्या महिला, आशासेविका व अंगणवाडी सेविका, ऑटोचालक/ रिक्षाचालक, वृतपत्र विक्रेते, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, फुटपाथवरील विक्रेते, पीठ गिरणी कामगार यांचा समावेश आहे

टॅग्स :LabourकामगारGadchiroliगडचिरोली