शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वृक्षताेडीमुळे समृद्ध जिल्ह्यातीलच पर्यावरण झाले ‘दीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST

वैरागड : सरकारी यंत्रणा पर्यावरण रक्षणासाठी नव्हे तर पर्यावरणाला आणखी समृद्ध करण्यासाठी असतात; पण ‘कुंपणाने शेत खाल्ले तर दाद ...

वैरागड : सरकारी यंत्रणा पर्यावरण रक्षणासाठी नव्हे तर पर्यावरणाला आणखी समृद्ध करण्यासाठी असतात; पण ‘कुंपणाने शेत खाल्ले तर दाद मागायची कुणाकडे’ अशी स्थिती सध्या जिल्ह्यात आहे. वन विभाग, वन विकास महामंडळ आणि जंगल कामगार सहकारी संस्था यांच्याकडून बऱ्याच प्रमाणात जंगलतोड होत आहे. हे असेच सुरू राहिल्यास येत्या काही वर्षांत जंगलाने समृद्ध असलेल्या जिल्ह्यात पर्यावरण दिन साजरा करण्याऐवजी पर्यावरणच ‘दीन’ झाले, असे म्हणण्याची वेळ येणार आहे.

गडचिराेली जिल्ह्यातील सर्व घनदाट जंगले वन विभागाने एफडीसीएमकडे वर्ग केली आहेत. वन विकास महामंडळाने मौल्यवान जंगल लावण्याच्या नादात नैसर्गिकरीत्या उभी असलेली लाख मोलाची झाडे नष्ट केली. आरमोरी तालुक्यातील वैरागड, सालमारा, कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा, भगवानपूर, शिरपूर तसेच वडसा तालुक्यातील चिखली (रिठ) ही घनदाट जंगले मागील पाच वर्षांत सपाट केली. पर्यावरण आपल्याला शुद्ध हवा देते; पण आपण स्वतःच्या फायद्यासाठी उभे जंगल नष्ट होताना उघड्या डोळ्यांनी मूकपणे पाहत असताे. पर्यावरणाचा असाच विनाश होत राहिल्यास येत्या काही वर्षांत मानवाला अणुबाॅम्बपेक्षा भयानक परिणाम भोगावे लागतील, असा इशारा एका पर्यावरणवादी अमेरिकन संस्थेने दिला आहे. आपल्याकडे नैसर्गिक संसाधने अपुरी पडत असताना जंगल व पर्यावरणाची होणारी हानी ही चिंतेची बाब आहे.

जिल्ह्यातील जंगल कामगार संस्था या वनविभागाच्या आदेशानुसार वठलेल्या व वयस्क झाडांचे मूल्यांकन करून २० टक्के अनुदान घेऊन संस्थेच्या सभासदांमार्फत कूपकामे करतात. या माध्यमातून ते आपल्या संस्था चालवितात. परंतु जंगल तोडून संस्था चालविणे कितपत याेग्य आहे, असा सवालही पर्यावरणवाद्यांकडून हाेत आहे.

बहरलेले वृक्ष तोडणे म्हणजे अत्याचार ठरतो, असे सांगणारे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज; झाडाआधी मला कापा, असे म्हणणारे सुंदरलाल बहुगुणा यांनी जी सामाजिक बांधिलकी व जाणीव सांभाळली, ती आता नष्ट करायला निघालो आहोत. मोठ्या कष्टाने वडिलांनी कमावलेली इस्टेट उनाड मुलाने उडवावी, अशी स्थिती सध्या झाली आहे. वृक्षताेडीच्या माध्यमातून अशीच पर्यावरणाची हानी हाेत राहिल्यास जिल्ह्यातील पर्यावरणाची बिकट स्थिती हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही, हेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगता येईल.

बाॅक्स

लागवड केलेली ९० टक्के राेपे गायब

वन विभाग वृक्षाराेपणाच्या नावाखाली नैसर्गिकरीत्या उभे असलेले समृद्ध जंगल नष्ट करून त्याठिकाणी मानवीकृत जंगल तयार करत आहे. जिल्ह्यात मागील १५-२० वर्षांत वन विभागाने तयार केलेली मानवीकृत जंगले किती जिवंत आहेत, याचा सर्व्हे केल्यास १० टक्केही जंगले शिल्लक दिसणार नाहीत. तत्कालीन सरकारने माेठा गाजावाजा करून ३३ काेटी वृक्षलागवड माेहीम पाच वर्षे राबविली, त्या याेजनेचे केव्हाचेच बारा वाजले. वृक्षसंवर्धनाबाबत असलेल्या बहुतांश याेजना नापास असल्याचे आजवरच्या उद्दिष्टपूर्तीवरून दिसून येत आहे.

===Photopath===

040621\img-20210604-wa0025.jpg

===Caption===

समृद्ध जिल्ह्यातील पर्यावरण 'दिन झाला या बातमीसाठी फोटो