पावसाअभावी धान पऱ्हे कोरडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST2020-07-23T05:00:00+5:302020-07-23T05:00:07+5:30
रांगी परिसरात संपूर्ण शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. वर पाण्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र पावसाचे चार नक्षत्र संपूनही अपेक्षित पाऊस झाला नाही. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, असे शेतकरी रोवणीची कामे आटोपत आहेत. मात्र ज्यांच्याकडे ही साधने उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.

पावसाअभावी धान पऱ्हे कोरडेच
लोकमत न्यूज नेटवर्क
रांगी : मागील वर्षीचा खरीप हंगाम संपल्यानंतरही नवीन वर्षापर्यंत तसेच नवीन वर्षाच्या पाच महिन्यातसुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उन्हाळ्यातच शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे करून दरवर्षीच्या तुलनेत पंधरवड्यापूर्वी पेरणी आटोपली. सध्या हंगामाला दीड महिना उलटला. मात्र अद्यापही अपेक्षित पाऊस झाला नाही. परिणामी रोवणीची कामे खोळंबली आहेत. सध्या धान पºहे कोरडेच आहेत. रांगी परिसरातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
रांगी परिसरात संपूर्ण शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. वर पाण्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र पावसाचे चार नक्षत्र संपूनही अपेक्षित पाऊस झाला नाही. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, असे शेतकरी रोवणीची कामे आटोपत आहेत. मात्र ज्यांच्याकडे ही साधने उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. मृग व आर्द्रा नक्षत्रात टाकलेले धान पऱ्हे मुदतबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. पऱ्हे मुदतबाह्य होऊ नये म्हणून मोटारपंप, सौरऊर्जापंप, डिझेल इंजिनच्या माध्यमातून रोवणी करीत आहेत. मात्र या भागात अद्यापही तलाव, बोड्या कोरड्याच दिसून येतात. सर्व शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून जोरदार पाऊस होऊन रोवणी केव्हा सुरू होईल, याची प्रतीक्षा सर्वांना आहे.
गावोगावी मजुरांची वाहतूक
बहुतांश गावांमध्ये सिंचनाची साधने नसल्याने शेतकरी व शेतमजूर कामाविना आहेत. त्यामुळे रोवणी सुरू असलेल्या बाहेरगावी वाहनाद्वारे मजुरांची वाहतूक केली जात आहे. १० ते १५ किमीचे अंतर वाहनाने ने-आण करण्याची जबाबदारी अनेक शेतकरी स्वीकारत आहेत.