पावसाअभावी धान राेवणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 05:00 IST2021-07-05T05:00:00+5:302021-07-05T05:00:28+5:30

राेवणी करण्यासाठी सर्वप्रथम पऱ्हे टाकले जातात. हे पऱ्हे २० दिवसांच्या कालावधीत दुसऱ्या बांधीत राेवावे लागतात. त्यापेक्षा उशीर झाल्यास धानाच्या उत्पादनात घट हाेते. धानाचे पऱ्हे टाकल्याला आता २० दिवसांपेक्षा अधिक कालावधी हाेत चालला आहे. धानाच्या राेवणीसाठी शेतकऱ्यांनी शेत तयार करून ठेवले आहेत. मात्र पाऊस पडत नसल्याने राेवणीची कामे रखडली आहेत. 

Due to lack of rain, paddy cultivation was delayed | पावसाअभावी धान राेवणी रखडली

पावसाअभावी धान राेवणी रखडली

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा, कडक उन्हामुळे पिकांना धाेका; मशागतीची कामे पूर्ण

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : धानाचे पऱ्हे राेवणी याेग्य झाली आहेत. मात्र पाऊस नसल्याने राेवणीची कामे रखडली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे. असेच शेतकरी धानाची राेवणी करीत असल्याचे दिसून येत आहे. 
गडचिराेली जिल्ह्यात सुमारे दाेन लाख हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. येथील अर्थव्यवस्था धानाच्या शेतीवर अवलंबून आहे. जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर धानाची राेवणी केली जाते, तर ५० हजार हेक्टर क्षेत्रावर आवत्या पद्धतीने धानाची लागवड केली जाते. 
राेवणी करण्यासाठी सर्वप्रथम पऱ्हे टाकले जातात. हे पऱ्हे २० दिवसांच्या कालावधीत दुसऱ्या बांधीत राेवावे लागतात. त्यापेक्षा उशीर झाल्यास धानाच्या उत्पादनात घट हाेते. धानाचे पऱ्हे टाकल्याला आता २० दिवसांपेक्षा अधिक कालावधी हाेत चालला आहे. धानाच्या राेवणीसाठी शेतकऱ्यांनी शेत तयार करून ठेवले आहेत. मात्र पाऊस पडत नसल्याने राेवणीची कामे रखडली आहेत. 

धानाची राेवणी उशिरा झाल्यास उत्पादनात घट हाेते. असा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी माझ्या शेतात सर्वाधिक आवत्याच टाकला आहे. कृषी विभाग धान लागवडीच्या नवनवीन पद्धती आणत आहे. त्याचा अवलंब करण्याची गरज आहे. पुढच्या वर्षी मी धानाची पेरणी करणार आहे. 
-नागेश दाेडके, शेतकरी

नायलाज म्हणून धानाची शेती करावी लागत आहे. दरवर्षीच पावसाचे विघ्न येतात. यावर्षी आता धानाचे पऱ्हे राेवण्याजाेेगे झाले आहेत. मात्र पाऊस नसल्याने राेवणीची कामे खाेळंबली आहेत. दमदार पाऊस पडल्यानंतर शेतकरी एकाचवेळी राेवणे सुरू करतात, अशावेळी मजुरी मिळत नाही. 
- रमेश उसेंडी, शेतकरी

कापसाचा पेरा वाढला
- जिल्ह्यात दरवर्षी कापसाचा पेरा वाढत चालला आहे. साेयाबीनची जागा आता कापूस घेत आहे. ज्या जागेवर साेयाबीन लावले जात हाेते. त्या ठिकाणी आता कापसाची लागवड केली जात आहे. धानानंतर कापसाचा पेरा जिल्ह्यात सर्वाधिक आहे. 

सिंचन असलेल्यांचे कमी खर्चात राेवणे
जिल्ह्यातील अत्यंत कमी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. विशेषकरून ज्या शेतकऱ्यांचे शेत वैनगंगा नदीला लागून आहे. अशाच शेतकऱ्यांकडे माेटरपंपची सुविधा आहे. अशाच शेतकऱ्यांचे धानाचे राेवणे सुरू आहेत. प्रत्येक गावात एक ते दाेनच शेतकऱ्यांकडे माेटरपंप आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे राेवणे सुरू नसल्याने अत्यंत कमी दरात मजूर उपलब्ध हाेत आहे. दमदार पाऊस सुरू झाल्यानंतर एकाचवेळी शेतकरी राेवणे सुरू करतात. त्यावेळी मजूर मिळत नाही.

 

Web Title: Due to lack of rain, paddy cultivation was delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.