शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

दुष्काळाने गडचिरोलीतील शेतक-यांची दैनावस्था, सरासरी उत्पन्न ६० टक्क्यांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 19:16 IST

सन १९८० च्या वनकायद्यामुळे नक्षलग्रस्त आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाच्या पाण्यावर शेती करतात.

गडचिरोली : सन १९८० च्या वनकायद्यामुळे नक्षलग्रस्त आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाच्या पाण्यावर शेती करतात. अत्यल्प पाऊस, रोगांच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतक-यांचे सरासरी उत्पन्न ६० टक्क्यांनी घटले. शेतक-यांच्या हाती ३५ ते ४० टक्के उत्पन्न आले. त्यात धानाला अपेक्षित भाव नसल्याने गडचिरोली जिल्ह्यातील शेतक-यांची दैनावस्था झाली आहे.वाढत्या महागाईनुसार शेतीपयोगी साहित्य तसेच खत, बियाणे व कीटकनाशकांचे भाव वाढले. मात्र त्या तुलनेत धानाच्या भावात वाढ झाली नाही. त्यामुळे शेतक-यांची परिस्थिती वाईट झाली आहे. शेतक-यांना यंदा बोनसही मिळत नसल्याने मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने काढलेली खरीप व रब्बी हंगामाची पीक पैसेवारी सदोष असल्याने अनेक शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहिले. जिल्ह्यात एकमेव हलदीपुरानी उपसा सिंचन योजनेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मात्र तत्कालीन आघाडी शासनाच्या काळात कार्यान्वित केलेल्या रेगडी, विकासपल्ली, गणपूर, अनखोडा येथील उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत. एकूणच गडचिरोली जिल्ह्यात सिंचन सुविधा निर्माण करण्याकडे विद्यमान राज्य सरकारचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात बहुतांश सामूहिक वनहक्काचे दावे प्रलंबित आहेत.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीFarmerशेतकरी