शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
3
Top Marathi News LIVE Updates: अंबरनाथमध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; लादी नाका परिसरात लाखो लीटर पाणी वाया
4
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
5
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
7
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
8
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
9
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
10
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
11
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
12
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
13
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
14
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
15
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
16
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
17
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
18
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
19
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: June 22, 2015 01:28 IST

शनिवारी दुपारी ३ वाजतापासून रविवारी सायंकाळपर्यंत मेघगर्जनेसह जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात दमदार पाऊस बरसला.

दीडशे गावांचा संपर्क तुटला : अहेरी-गडअहेरी, आलापल्ली-सिरोंचा मार्ग बंद, जिमलगट्टा-गोविंदगाव मार्गावरील पूल खचला
गडचिरोली : शनिवारी दुपारी ३ वाजतापासून रविवारी सायंकाळपर्यंत मेघगर्जनेसह जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात दमदार पाऊस बरसला. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस असल्यामुळे अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड तालुक्यातील जवळपास दीडशे गावांचा संपर्क पुरामुळे तुटला आहे. पुरामुळे अहेरी-गडअहेरी, आलापल्ली-सिरोंचा तसेच आलापल्ली-भामरागड मार्ग बंद झाले आहे. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टापासून गोविंदगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल अतिवृष्टीमुळे खचल्याने या मार्गावरीलही वाहतूक बंद आहे.
जिल्ह्यात शनिवारी दुपारी ३ वाजतापासून रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ८५.२० सरासरीने एकूण १०२२.४ मिमी पाऊस झाला. जिल्हा प्रशासनाने गडचिरोली तालुक्यात ८६.२, धानोरा २९.२, चामोर्शी १२२.०, मुलचेरा १३०.८, देसाईगंज ३६.०, आरमोरी २२.०, कुरखेडा २७.८, कोरची ४७.२, अहेरी १६१.२, एटापल्ली १८८.२ व सिरोंचा तालुक्यात १४१.८ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेतली आहे.
संततधार पावसामुळे नद्या, नाले तुडूंब भरुन वाहत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अहेरीनजीकच्या गडअहेरी पुलावरुन पाणी ओसंडून वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला आहे. परिणामी इंदाराम, व्यंकटरावपेठा, आवलमरी, चेरपल्ली, बामणी, कोत्तागुड्डम आदींसह परिसरातील ४० गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील रेपनपल्ली नाल्याला पूर आल्याने हा मार्गही बंद आहे. शिवाय आलापल्ली-भामरागड मार्गावरील छोट्या नाल्यांवरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आलापल्लीजवळील पुसुकपल्ली नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्ग बंद झाला आहे. भामरागड-लाहेरी मार्गही बंद आहे. या भागातील वीजपुरवठा व मोबाईलसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास अतिवृष्टीमुळे अहेरी येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील नामदेव कुळसंगे यांचे घर कोसळले. यावेळी ग्रा.पं. सदस्य शैलेश पटवर्धन यांनी कुळमेथे यांना मदत करुन त्यांना सुरक्षितस्थळी हलविले. अहेरी नगर पंचायतीचे प्रशासक सुरेश पुप्पलवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जिमलगट्टा परिसरातील वीज पुरवठा व मोबाईलसेवाही पूर्णपणे बंद आहे.
जिमलगट्टा ते गोविंदगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल अतिवृष्टीमुळे खचला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक शनिवारपासून बंद आहे. पूर परिस्थितीमुळे जिमलगट्टा भागातील देचलीपेठा, किष्टापूर, दोडगेर आदीसह २० गावांचा संपर्क तुटला आहे. धानोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक मार्गांवर झाडे आडवी पडली असून, वाहतुकीवर विपरित परिणाम झाला आहे. आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, अहेरी तालुक्यातील प्राणहिता व सिरोंचानजीकची पामुलगौतम नदी संततधार पावसामुळे दुथळी भरून वाहत आहे. भामरागड तालुक्यातील दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवा ठप्प झाली आहे.एटापल्ली तालुक्यात गेदा परिसरात अनेक मार्गावर झाडे कोसळली.
संततधार पावसामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यातील पेरणीची कामे खोळंबली आहेत. पावसामुळे गडचिरोली शहरातील कन्नमवारनगर, अयोध्या नगर, लांजेडा, बसस्थानक, तहसील कार्यालय, गांधी वार्ड , तसेच कॉम्प्लेक्स परिसरातील काही सखल भागात पाणी साचले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)