शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

‘डोंगा’ हीच इंद्रावतीच्या बेटावरील त्या आदिवासींसाठी बुलेट ट्रेन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST

महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना विभागणाऱ्या इंद्रावती नदीच्या मधोमध बेटावर अनेक वर्षांपासून हे गाव वसले आहे. अहेरी तालुक्यात येत असलेल्या दामरंचा ग्रामपंचायतअंतर्गत या गावाचा समावेश होतो. मात्र मेट्रो, बुलेट ट्रेनच्या जमान्यात या गावातील माणसं अजूनही आदिम जीवन जगत असल्याचं वास्तव आहे. गाव बेटावर वसले असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी ना रस्ता, ना पूल, ना मेट्रो, ना बुलेट ट्रेन आहे. आहे तो केवळ पारंपरिक डोंगा (छोटी नाव). हा डोंगाच आदिवासींसाठी बुलेट ट्रेन झाला आहे.

श्रीधर डुग्गीरालापाटीलाेकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : ‘पुराच्या पाण्याने गावाचा संपर्क तुटला...’ असा हेडींगच्या बातम्या गेल्या कित्येक वर्षापासून दर पावसाळ्यात वाचायला मिळतात, पण बाराही महिने त्या गावाला पाण्याचा वेढा कायम असतो. साधं मोबाईलचं नेटवर्क नसेल किंवा बॅटरी 'लो' झाली की आपल्या जीवाची घालमेल सुरू होते. पण हे गाव तर कायमच संपर्काबाहेर असतं. अशा या गावातील लोक कसे राहात असतील आणि कसे जगत असतील? असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. त्या गावाचे नाव आहे ‘कुर्ता’.महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना विभागणाऱ्या इंद्रावती नदीच्या मधोमध बेटावर अनेक वर्षांपासून हे गाव वसले आहे. अहेरी तालुक्यात येत असलेल्या दामरंचा ग्रामपंचायतअंतर्गत या गावाचा समावेश होतो. मात्र मेट्रो, बुलेट ट्रेनच्या जमान्यात या गावातील माणसं अजूनही आदिम जीवन जगत असल्याचं वास्तव आहे. गाव बेटावर वसले असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी ना रस्ता, ना पूल, ना मेट्रो, ना बुलेट ट्रेन आहे. आहे तो केवळ पारंपरिक डोंगा (छोटी नाव). हा डोंगाच आदिवासींसाठी बुलेट ट्रेन झाला आहे. दामरंचावरून तीन किमी अंतर डोंगर, जंगलातून वाट काढत पार करावे लागते. इतके दिव्य पार केल्यानंतरही पायपीट संपत नाही. इंद्रावतीपर्यंत पोहोचले की, गावकऱ्यांनी स्वतः लाकडापासून तयार केलेल्या बोटीचा वापर करून जलप्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. ही परिस्थिती बाराही महिने असते. इंद्रावती नदीचे पात्र मोठे असल्याने बाराही महिने पाणी असते. चारही बाजुने चमचमणारे पाणी, निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे गाव म्हणजे पर्यंटकांसाठी स्वर्गच. पण या धरतीवरच्या स्वर्गात जाण्यासाठी रस्ताच, गावातील घरांमध्ये वीज पुरवठाही नाही. गावात प्रवेश केल्यावर पडक्या झोपड्या, दोन-चार भांडी, दोन-चार पिशव्या, चुलीसाठी मांडलेले तीन दगड आणि काही कपडे दिसतात.

कुणी छत्तीसगडी, कुणी महाराष्ट्राचे रहिवासी-    गावात असलेल्या अवघ्या पाच ते सहा कुटुंबांशी संपर्क साधला असता काही नागरिकांकडे छत्तीसगड आणि काहींकडे महाराष्ट्राचे आधारकार्ड असल्याचे दिसून आले. काही आदिवासींना घरकुल मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र या ठिकाणी घर बांधकाम करायला साहित्य नेण्याची मोठी अडचण असल्याने आहे त्याच परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे.

सरकार पुढाकार घेणार का?मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी आदिवासी बांधव वास्तव्याने असून बाराही महिने त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने काही कुटुंबांनी हे गाव सोडल्याचे सांगितले जाते. उरलेले पाच ते सहा कुटुंब बाहेर का येत नाही असे विचारले असता 'आम्हाला जागा कोण देणार, शेती सोडून आल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार, शासनाने पुढाकार घेऊन मदत केल्यास आम्ही बाहेर येऊ' असे आदिवासी बांधवांनी सांगितलं. जगाच्या सानिध्यात आणि जवळ आणण्यासाठी या गावाचे पुनर्वसन करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनriverनदी