शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘डोंगा’ हीच इंद्रावतीच्या बेटावरील त्या आदिवासींसाठी बुलेट ट्रेन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST

महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना विभागणाऱ्या इंद्रावती नदीच्या मधोमध बेटावर अनेक वर्षांपासून हे गाव वसले आहे. अहेरी तालुक्यात येत असलेल्या दामरंचा ग्रामपंचायतअंतर्गत या गावाचा समावेश होतो. मात्र मेट्रो, बुलेट ट्रेनच्या जमान्यात या गावातील माणसं अजूनही आदिम जीवन जगत असल्याचं वास्तव आहे. गाव बेटावर वसले असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी ना रस्ता, ना पूल, ना मेट्रो, ना बुलेट ट्रेन आहे. आहे तो केवळ पारंपरिक डोंगा (छोटी नाव). हा डोंगाच आदिवासींसाठी बुलेट ट्रेन झाला आहे.

श्रीधर डुग्गीरालापाटीलाेकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : ‘पुराच्या पाण्याने गावाचा संपर्क तुटला...’ असा हेडींगच्या बातम्या गेल्या कित्येक वर्षापासून दर पावसाळ्यात वाचायला मिळतात, पण बाराही महिने त्या गावाला पाण्याचा वेढा कायम असतो. साधं मोबाईलचं नेटवर्क नसेल किंवा बॅटरी 'लो' झाली की आपल्या जीवाची घालमेल सुरू होते. पण हे गाव तर कायमच संपर्काबाहेर असतं. अशा या गावातील लोक कसे राहात असतील आणि कसे जगत असतील? असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. त्या गावाचे नाव आहे ‘कुर्ता’.महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना विभागणाऱ्या इंद्रावती नदीच्या मधोमध बेटावर अनेक वर्षांपासून हे गाव वसले आहे. अहेरी तालुक्यात येत असलेल्या दामरंचा ग्रामपंचायतअंतर्गत या गावाचा समावेश होतो. मात्र मेट्रो, बुलेट ट्रेनच्या जमान्यात या गावातील माणसं अजूनही आदिम जीवन जगत असल्याचं वास्तव आहे. गाव बेटावर वसले असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी ना रस्ता, ना पूल, ना मेट्रो, ना बुलेट ट्रेन आहे. आहे तो केवळ पारंपरिक डोंगा (छोटी नाव). हा डोंगाच आदिवासींसाठी बुलेट ट्रेन झाला आहे. दामरंचावरून तीन किमी अंतर डोंगर, जंगलातून वाट काढत पार करावे लागते. इतके दिव्य पार केल्यानंतरही पायपीट संपत नाही. इंद्रावतीपर्यंत पोहोचले की, गावकऱ्यांनी स्वतः लाकडापासून तयार केलेल्या बोटीचा वापर करून जलप्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. ही परिस्थिती बाराही महिने असते. इंद्रावती नदीचे पात्र मोठे असल्याने बाराही महिने पाणी असते. चारही बाजुने चमचमणारे पाणी, निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे गाव म्हणजे पर्यंटकांसाठी स्वर्गच. पण या धरतीवरच्या स्वर्गात जाण्यासाठी रस्ताच, गावातील घरांमध्ये वीज पुरवठाही नाही. गावात प्रवेश केल्यावर पडक्या झोपड्या, दोन-चार भांडी, दोन-चार पिशव्या, चुलीसाठी मांडलेले तीन दगड आणि काही कपडे दिसतात.

कुणी छत्तीसगडी, कुणी महाराष्ट्राचे रहिवासी-    गावात असलेल्या अवघ्या पाच ते सहा कुटुंबांशी संपर्क साधला असता काही नागरिकांकडे छत्तीसगड आणि काहींकडे महाराष्ट्राचे आधारकार्ड असल्याचे दिसून आले. काही आदिवासींना घरकुल मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र या ठिकाणी घर बांधकाम करायला साहित्य नेण्याची मोठी अडचण असल्याने आहे त्याच परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे.

सरकार पुढाकार घेणार का?मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी आदिवासी बांधव वास्तव्याने असून बाराही महिने त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने काही कुटुंबांनी हे गाव सोडल्याचे सांगितले जाते. उरलेले पाच ते सहा कुटुंब बाहेर का येत नाही असे विचारले असता 'आम्हाला जागा कोण देणार, शेती सोडून आल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार, शासनाने पुढाकार घेऊन मदत केल्यास आम्ही बाहेर येऊ' असे आदिवासी बांधवांनी सांगितलं. जगाच्या सानिध्यात आणि जवळ आणण्यासाठी या गावाचे पुनर्वसन करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनriverनदी