मत्स्य व्यवसायातून कमावले दाेन लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST2021-02-05T08:48:23+5:302021-02-05T08:48:23+5:30
आरमोरी : तालुक्यातील वडधा येथील राजेंद्र डाेमा खेवले या शेतकऱ्याने स्वत:च्या बाेडीत जरंग या प्रजातीच्या माशाचे बीज टाकले. या ...

मत्स्य व्यवसायातून कमावले दाेन लाख रुपये
आरमोरी : तालुक्यातील वडधा येथील राजेंद्र डाेमा खेवले या शेतकऱ्याने स्वत:च्या बाेडीत जरंग या प्रजातीच्या माशाचे बीज टाकले. या मत्स्य व्यवसायातून खेवले यांनी १ लाख ८० हजार रुपये कमावले आहेत.
कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे या याेजनेचा राजेंद्र खेवले यांनी लाभ घेत शेतात शेततळ्यांचे खाेदकाम केले. शेततळ्यातील पाण्यामुळे विहिरीची पाणीपातळी वाढली. खेवले हे यापूर्वी आपल्या शेतात धान व हरभरा या दाेनच पिकांचे उत्पादन घेत हाेते. विहिरीची पाणीपातळी वाढल्यानंतर हरभरासाेबतच इतरही पिके घेण्याचा निर्णय खेवले यांनी घेतला. मागील वर्षी त्यांना १ लाख ३२ हजार रुपयांचे धान, दोन लाख रुपयांचा मका व ८० हजार रुपयांच्या संकरीत मिरचीचे उत्पादन घेतले. यावर्षी पुन्हा त्यांनी बाेडीत २ हजार २०० मत्स्य बीज टाकले आहे. १ हेक्टर जागेत मका पिकाची लागवड केली आहे. याही वर्षी लाखाे रुपयांचे उत्पन्न हाेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी केलेले प्रयाेग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहेत.