शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

बालपणीच आपत्ती निवारणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:54 IST

जिल्हा शैक्षणिक सातत्त्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआयईसीपीडी) व शाळेच्या पुढाकाराने जिल्हाभरातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडते. त्याचबरोबर नदीनाल्यांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देहजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण : जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा शैक्षणिक सातत्त्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआयईसीपीडी) व शाळेच्या पुढाकाराने जिल्हाभरातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत.गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडते. त्याचबरोबर नदीनाल्यांची संख्या अधिक आहे. अख्या संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात केवळ चार ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे. अग्निशमन यंत्र घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने घर, इमारत जळून खाक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारची नैैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती निर्माण झाल्यास स्वत:चा बचाव करण्याबरोबरच दुसऱ्यांचा बचाव करता येणे आवश्यक आहे. आपत्तीचे निवारण करताना काही तांत्रिक बाबीनुसार प्रयत्न करावा लागतो. मात्र विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांनाही याची माहिती राहत नाही. विद्यार्थी हे समाज व कुटुंबांचे सदस्य आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जर आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले तर त्याची माहिती ते आपल्या कुटुंबियांना व समाजाला देऊ शकतील. आपत्ती निवारण करण्यासाठी स्वतंत्र विभाग असला तरी या विभागाकडे पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे या विभागामार्फत आपत्ती निवारणाचे धडे देणे शक्य नाही.आपत्ती निवारण व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन जिल्हा शैक्षणिक सातत्त्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. शरदचंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचा संकल्प केला. त्यानुसार नियोजन केले. २५ आॅगस्ट रोजी शाळांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे द्यावे, असे निर्देश डॉ. शरदचंद्र पाटील यांनी शाळांना दिले. त्या दिवशी शक्य न झाल्यास पुढील तारखेत कोणत्याही दिवशी प्रशिक्षण द्यावे. मात्र प्रत्येक शाळेने प्रशिक्षण आयोजित करणे अनिवार्य केले आहे.यासाठी मुख्याध्यापकांची कार्यशाळा सुद्धा घेण्यात आली. डीआयईसीपीडीचा आदेश धडकताच जिल्हाभरातील जवळपास ७० टक्के शाळांनी शनिवारीच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित केले. काही अपरिहार्य कारणांमुळे काही शाळांनी प्रशिक्षण आयोजित केले नाही. या शाळा आता सोमवारी किंवा मंगळवारी प्रशिक्षण आयोजित करणार आहेत. प्रशिक्षणादरम्यान ३० ते ५० विद्यार्थ्यांचा एक गट तयार केला केला गेला. त्या गटासाठी एक सुलभ नेण्यात आला. पाचवी ते आठवीसाठी ५० प्रश्न असलेली पुस्तिका सुलभकाकडे देण्यात आली. सुलभक प्रत्येक प्रश्न वाचून विद्यार्थ्यांना सांगतो. प्रश्नानंतर चार पर्याय दिले असून त्यातील सर्वात योग्य कोणता पर्याय आहे, याची निवड विद्यार्थ्यांनी करायची आहे. विद्यार्थ्यांनी सदर पर्याय निवडल्यावर हाच पर्याय का बरोबरच आहे. यावर सुलभक विद्यार्थ्यासोबत चर्चा करेल. या चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाची माहिती मिळण्यास मदत होत आहे. या अनोख्या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आहे.विद्यार्थी हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांना जर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिल्यास ते प्रशिक्षण संपूर्ण समाजासाठी उपयोगात येईल. एका विद्यार्थ्यामुळे शेकडो नागरिकांचे जीवन वाचण्यास मदत होईल. आपत्ती व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे प्रशिक्षण आहे. आपत्ती व्यवस्थापनाची माहिती प्रत्येक व्यक्तीला असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी याला चांगला प्रतिसाद दिला. प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकाºयांचे मार्गदर्शन घेण्यात आले. आजच्या प्रशिक्षणाचा विद्यार्थी व समाजाला निश्चितच लाभ होईल.- डॉ. शरदचंद्र पाटील, प्राचार्य, डीआयईसीपीडी

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी