शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

बालपणीच आपत्ती निवारणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:54 IST

जिल्हा शैक्षणिक सातत्त्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआयईसीपीडी) व शाळेच्या पुढाकाराने जिल्हाभरातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडते. त्याचबरोबर नदीनाल्यांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देहजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण : जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा शैक्षणिक सातत्त्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआयईसीपीडी) व शाळेच्या पुढाकाराने जिल्हाभरातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत.गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडते. त्याचबरोबर नदीनाल्यांची संख्या अधिक आहे. अख्या संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात केवळ चार ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे. अग्निशमन यंत्र घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने घर, इमारत जळून खाक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारची नैैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती निर्माण झाल्यास स्वत:चा बचाव करण्याबरोबरच दुसऱ्यांचा बचाव करता येणे आवश्यक आहे. आपत्तीचे निवारण करताना काही तांत्रिक बाबीनुसार प्रयत्न करावा लागतो. मात्र विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांनाही याची माहिती राहत नाही. विद्यार्थी हे समाज व कुटुंबांचे सदस्य आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जर आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले तर त्याची माहिती ते आपल्या कुटुंबियांना व समाजाला देऊ शकतील. आपत्ती निवारण करण्यासाठी स्वतंत्र विभाग असला तरी या विभागाकडे पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे या विभागामार्फत आपत्ती निवारणाचे धडे देणे शक्य नाही.आपत्ती निवारण व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन जिल्हा शैक्षणिक सातत्त्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. शरदचंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचा संकल्प केला. त्यानुसार नियोजन केले. २५ आॅगस्ट रोजी शाळांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे द्यावे, असे निर्देश डॉ. शरदचंद्र पाटील यांनी शाळांना दिले. त्या दिवशी शक्य न झाल्यास पुढील तारखेत कोणत्याही दिवशी प्रशिक्षण द्यावे. मात्र प्रत्येक शाळेने प्रशिक्षण आयोजित करणे अनिवार्य केले आहे.यासाठी मुख्याध्यापकांची कार्यशाळा सुद्धा घेण्यात आली. डीआयईसीपीडीचा आदेश धडकताच जिल्हाभरातील जवळपास ७० टक्के शाळांनी शनिवारीच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित केले. काही अपरिहार्य कारणांमुळे काही शाळांनी प्रशिक्षण आयोजित केले नाही. या शाळा आता सोमवारी किंवा मंगळवारी प्रशिक्षण आयोजित करणार आहेत. प्रशिक्षणादरम्यान ३० ते ५० विद्यार्थ्यांचा एक गट तयार केला केला गेला. त्या गटासाठी एक सुलभ नेण्यात आला. पाचवी ते आठवीसाठी ५० प्रश्न असलेली पुस्तिका सुलभकाकडे देण्यात आली. सुलभक प्रत्येक प्रश्न वाचून विद्यार्थ्यांना सांगतो. प्रश्नानंतर चार पर्याय दिले असून त्यातील सर्वात योग्य कोणता पर्याय आहे, याची निवड विद्यार्थ्यांनी करायची आहे. विद्यार्थ्यांनी सदर पर्याय निवडल्यावर हाच पर्याय का बरोबरच आहे. यावर सुलभक विद्यार्थ्यासोबत चर्चा करेल. या चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाची माहिती मिळण्यास मदत होत आहे. या अनोख्या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आहे.विद्यार्थी हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांना जर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिल्यास ते प्रशिक्षण संपूर्ण समाजासाठी उपयोगात येईल. एका विद्यार्थ्यामुळे शेकडो नागरिकांचे जीवन वाचण्यास मदत होईल. आपत्ती व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे प्रशिक्षण आहे. आपत्ती व्यवस्थापनाची माहिती प्रत्येक व्यक्तीला असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी याला चांगला प्रतिसाद दिला. प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकाºयांचे मार्गदर्शन घेण्यात आले. आजच्या प्रशिक्षणाचा विद्यार्थी व समाजाला निश्चितच लाभ होईल.- डॉ. शरदचंद्र पाटील, प्राचार्य, डीआयईसीपीडी

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी