शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वेलगूर परिसराचा विकास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 02:17 IST

तालुक्यातील वेलगूर, बोटलाचेरू, नवेगाव या परिसरात अनेक समस्या आहेत. या समस्या सोडविण्यात याव्या,

रस्ता रोको करण्याचा इशारा : गावकरी तहसीलवर धडकलेअहेरी : तालुक्यातील वेलगूर, बोटलाचेरू, नवेगाव या परिसरात अनेक समस्या आहेत. या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. वेलगूर-बोटलाचेरू मार्गाचे सन २००७-०८ मध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत काम करण्यात आले. या योजनेंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्ष देखभाल करण्याचे काम कंत्राटदाराचे राहते. मात्र कंत्राटदाराने अजूनपर्यंत फिरकूनही बघितले नाही. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे मानव विकास मिशनच्या बसेस सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्यामुळे अनेक अपघात झाले असून पाच लोकांना जीव गमवावा लागला आहे. गावकरी त्रस्त झाले आहेत. वेलगूर-नवेगाव-बोटलाचेरू गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, आदिवासी, गैरआदिवासी व पारंपरिक रहिवाशांना पट्टे देण्यात यावे, वेलगूर पीएचसी ते शंकरपूरपर्यंत रस्त्याचे बांधकाम करावे, वेलगूर येथे थ्री-जी सेवा सुरू करावी, २०१४-१५ चे तेंदू बोनस वितरित करावे, पांदण रस्त्याची मजुरी देण्यात यावी, जिल्हा परिषद शाळेला नवीन इमारत बांधून द्यावी, घरकूल योजनेचे देयके त्वरित द्यावे, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थ तालुका कचेरीवर धडकले. मागण्या पूर्ण न झाल्यास १४ सप्टेंबरपासून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला. सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांच्या नेतृत्वात तहसीलदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, संवर्ग विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वेलगूरचे सरपंच आशन्ना दुधी, किष्टापुरचे सरपंच अंजना पेंदाम, पंचायत समिती सदस्य आत्माराम गद्देकर, तंमुस अध्यक्ष रवींद्र उरेते, पोलीस पाटील मनोहर चालुरकर, सीताराम मेश्राम, राजेश उत्तरवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)