शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

वैनगंगेच्या पुलावरील लोखंडी कठड्यांसाठी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:00 IST

वास्तविक वर्दळीच्या मार्गावरील हा पूल कठड्यांअभावी प्रवासासाठी धोकादायक झाला आहे. कठड्याची दुरुस्ती करावी किंवा नवीन कठडे लावावे यासाठी वारंवार निवेदने देऊनसुद्धा पुलाला संरक्षक कठडे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे २ फेब्रुवारीला प्रहार, युवारंग, माकपा, मनसे, शिवसेना आणि वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नदीपुलाजवळ बेमुदत   धरणे आंदोलनाला सुरुवात केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : नागपूर ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून राहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुलावरील कठडे २०२० मध्ये ऑगस्ट महिन्याच्या महापुरात वाहून गेले. आता दीड वर्षाचा कालावधी लोटूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ते कठडे पुन्हा लावण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे धोकादायक झालेल्या या पुलावरील कठडे पुन्हा सुस्थितीत करण्यासाठी विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार (दि.२) पासून पुलाजवळच धरणे आंदोलन सुरू केले.  वास्तविक वर्दळीच्या मार्गावरील हा पूल कठड्यांअभावी प्रवासासाठी धोकादायक झाला आहे. कठड्याची दुरुस्ती करावी किंवा नवीन कठडे लावावे यासाठी वारंवार निवेदने देऊनसुद्धा पुलाला संरक्षक कठडे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे २ फेब्रुवारीला प्रहार, युवारंग, माकपा, मनसे, शिवसेना आणि वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नदीपुलाजवळ बेमुदत   धरणे आंदोलनाला सुरुवात केली.याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित बनकर, युवारंगचे अध्यक्ष राहुल जुआरे, प्रहारचे सेवक निखिल धार्मिक, माकपाचे जिल्हा महासचिव अमोल मारकवार, युवारंगचे उपाध्यक्ष मनोज गेडाम, शिवसेना तालुका अध्यक्ष महेंद्र शेंडे, वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाणे, सचिव दीपक सोनकुसरे, अंकुश गाढवे, युवारंगचे नेपचंद्र पेलणे, संघटक सूरज पडोळे, प्रशांत सोरते, करण गरमळे, जियाऊल पठाण, मनसेचे आशुतोष गिरडकर, किशोर जंवजाळकर उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेची महामार्ग प्राधिकरणकडून अवहेलना

-   ऑगस्ट २०२०च्या महापुरात वाहून गेलेल्या या पुलावरील लोखंडी कठड्यांची दुरुस्ती करण्यासाठी युवारंग क्लबने जिल्हाधिकाऱ्यांना वर्षभरापूर्वी निवेदन दिले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी संबंधित विभागाला १९ जानेवारी २०२१ ला पत्र देऊन लोखंडी कठडे लावण्याच्या  सूचना दिल्या होत्या. मात्र महामार्ग विभागाने जिल्हाधिकाऱ्यांची सूचनाही पाळली नाही. कठड्यांची दुरुस्ती न झाल्याने नदीच्या पुलावर अपघात झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला काेण जबाबदार राहणार?

अपघातानंतरच जाग येईल का?-    वैनगंगा नदीपुलावरून प्रवास करताना नागरिकांना व वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. जोपर्यंत पुलावर मोठा अपघात होऊन जीवितहानी होणार नाही, तोपर्यंत काहीच करणार नाही, असा निश्चय संबंधित विभागाने केला आहे का? असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला आहे? जोपर्यंत पुलाला लोखंडी कठडे लावण्यात येणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे या आंदोलकांनी सांगितले.

 

टॅग्स :agitationआंदोलन