अडकून पडलेल्या वऱ्हाडाला सीआरपीएफकडून भोजनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:01 IST2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:01:02+5:30
माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील सानगडी येथील लग्न वऱ्हाड शंकरनारायण गरारे यांच्याकडे तर दुसरे वऱ्हाड आंबेडकर वॉर्डमधील कृपाल नीळकंठ सोनोने यांच्याकडे २३ मार्च रोजी आले होते. लग्नानंतर २० ते २५ लोक त्यांच्याकडेच मुक्कामी होते. यादरम्यान लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे ते आपल्या गावी जाऊ शकले नाही. एवढ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी कठिण झाले होते.

अडकून पडलेल्या वऱ्हाडाला सीआरपीएफकडून भोजनदान
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : लग्नासाठी येथे आलेल्या पण लॉकडाऊन सुरू होताच अडकून पडलेल्या भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील वऱ्हाड्यांच्या दररोजच्या जेवणाची नि:शुल्क व्यवस्था येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने केली जात आहे. याशिवाय अडकून पडलेले अनेक कामगार आणि गोरगरिबांनाही भोजनदान करण्याची व्यवस्था सीआरपीएफच्या १९१ बटालीयनने केली आहे.
प्राप्त माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील सानगडी येथील लग्न वऱ्हाड शंकरनारायण गरारे यांच्याकडे तर दुसरे वऱ्हाड आंबेडकर वॉर्डमधील कृपाल नीळकंठ सोनोने यांच्याकडे २३ मार्च रोजी आले होते. लग्नानंतर २० ते २५ लोक त्यांच्याकडेच मुक्कामी होते. यादरम्यान लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे ते आपल्या गावी जाऊ शकले नाही. एवढ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी कठिण झाले होते. त्यामुळे सीआरपीएफ बटालीयनने त्यांच्या जेवणासोबतच लहान मुलांच्या दुधाचीही व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळे त्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी कमांडंट प्रभाकर त्रिपाठी व सहकारी मेहनत घेत आहेत.