शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

कोरोनाचा वेग मंदावला; पण आता डेंग्यू, मलेरियाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 5:00 AM

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप आता बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे नागरिकांमधील कोरोनाची दहशतही काही प्रमाणात कमी झाली ...

ठळक मुद्देगेल्यावर्षी ६,४८५ जणांना ग्रासले : सात जणांचा झाला होता मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप आता बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे नागरिकांमधील कोरोनाची दहशतही काही प्रमाणात कमी झाली आहे; पण पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे आता मलेरिया, डेंग्यू आणि मेंदुज्वरासारख्या आजारांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. गेल्यावर्षी या आजारांनी साडेसहा हजार नागरिकांना ग्रासले होते. याशिवाय ७ जणांचा बळीही घेतला होता. जंगलाचा प्रदेश असल्यामुळे ग्रामीण भागात पावसाळ्याला सुरुवात झाली की, ठिकठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढते. त्यातून सर्वाधिक प्रमाणात मलेरिया पसरतो. २०१७ पासूनचे आकडे पाहिल्यास जिल्ह्यात दरवर्षी मलेरियाचे अडीच हजार ते साडेसहा हजार, असे रुग्ण आढळले आहेत. त्यात गेल्या साडेचार वर्षांत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय मेंदुज्वरानेही सात जण दगावले आहेत. यावर्षी जानेवारी ते मे २०२१ या पाच महिन्यांत मलेरियाचे १,२४४ रुग्ण आढळले.  दोघांचा  मृत्यूही  झाला; पण जून ते डिसेंबर या कालावधीत डासांचे प्रमाण सर्वाधिक राहत असल्याने रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.

... ही घ्या काळजी

- डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, पाण्याचे डबके साचणार नाही, याची दक्षता घ्या. नेहमी साचणाऱ्या पाण्याच्या डबक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगून गप्पी मासे सोडा.

- संध्याकाळच्या वेळी घराची दारे-खिडक्या बंद ठेवा. रात्रीच्या वेळी झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. यामुळे डासांचा दंश होणार नाही आणि डासजन्य आजार होणार नाहीत.

- डासनाशकाची फवारणी करण्यासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा. घरात सर्वत्र फवारणी करून घ्या. नाली किंवा डबक्यात अधूनमधून रॉकेलसारखे तेलजन्य पदार्थ टाका.

जंगलामुळे गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. त्यामुळे दरवर्षी मच्छरदाण्यांचे वाटप केले जाते; पण लोक त्यांचा योग्य वापर करत नाहीत. तो केल्यास डासांमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.-डॉ. कुणाल मोडक, जिल्हा हिवताप अधिकारी

 

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य