शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

ट्विटरवर वादग्रस्त पोस्ट, पुणे-नागपूरातून दोघांना उचलले; कारवाईनंतर जितेंद्र आव्हाडांचा ट्विटरहल्ला

By संजय तिपाले | Updated: June 21, 2023 17:53 IST

चव्हाणला गडचिरोली पोलिसांनी पुण्यातील शिवाजीनगरमधून ताब्यात घेतले, पण त्यांच्याकडे अटक वॉरंट नव्हते, अंगात पोलिसांचा ड्रेसही नव्हता.

गडचिरोली : ट्विटरवरुन वादग्रस्त पोस्ट केल्याच्या आरोपाखाली गडचिरोलीपोलिसांनी २१ जून रोजी पुणे व नागपूर येथून दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, पुण्यातून एका युवकास ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन गडचिरोली पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेऊन महाराष्ट्रात हा काय प्रकार सुरु आहे, असा सवाल केला.

आदित्य चव्हाण व भारत पोरेडी अशी ताब्यात घेतलेल्या संशियत आरोपींची नावे आहेत. चव्हाणला पुण्यातून तर पोरेडीला नागपूर येथून २१ रोजी पहाटे ताब्यात घेतले आहे. गडचिरोली ठाण्यात ३१ मे २०२३ रोजी दोन ट्विटर हँडलरवर गुन्हा नोंद झाला होता. आक्षेपार्ह व वादग्रस्त मजकूर पोस्ट करुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा तक्रारदाराचा आरोप होता. दरम्यान, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलने याचा तांत्रिक तपास केला.   

ट्विटर तसेच एका खासगी मोबाइल कंपनीकडून मागविलेल्या तपशीलावरुन आदित्य चव्हाण व भारत पोरेडी यांनी हे ट्विटर अकाऊंड हाताळल्याचे समोर आले. त्यानंतर गुन्हे शाखेची दोन पथके पोलिस अधीक्षक नीलोत्पल व पो.नि.उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी शोधकामी रवाना झाली. २१ जून रोजी पहाटे पुण्यातून आदित्य चव्हाण व नागपूर येथून भारत पोरेडी यांना अटक करण्यात आली.

आव्हाडांनी काय केला आरोप ?

 दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पोस्ट करुन गडचिरोली पोलिसांच्या कारवाईबाबत आरोप केला. त्यानुसार, चव्हाणला गडचिरोली पोलिसांनी पुण्यातील शिवाजीनगरमधून ताब्यात घेतले, पण त्यांच्याकडे अटक वॉरंट नव्हते, अंगात पोलिसांचा ड्रेसही नव्हता. आई- बहिणीने अडविले असता त्यास चतु:श्रृंगी ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी त्याच्या आई- बहिणीशी वाद घातला व नंतर खासगी गाडीत घेऊन गेले. अंगात खाकी वर्दीही नव्हती. त्याच्या जीवाचे बरेवाईट झाले तर संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकारची राहील, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. चव्हाणच्या आईने हा संपूर्ण घटनाक्रम चतु:श्र्रुंगी ठाण्यातून सांगितल्याचाही पोस्टमध्ये उल्लेख आहे.

गडचिरोली पोलिस ठाण्यात ३१ मे रोजी गुन्हा नोंद झाला होता. त्याचा तांत्रिक तपास केल्यावर २० दिवसांनी दोन आरोपी निष्पन्न झाले. नागपूर व पुण्यात त्यांना ताब्यात घेतले असून पथक गडचिरोलीला येत आहे. संपूर्ण कारवाई ही कायदेशीर आहे.

- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

--

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJitendra Awhadजितेंद्र आव्हाडPoliceपोलिसTwitterट्विटरGadchiroliगडचिरोली