शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ट्विटरवर वादग्रस्त पोस्ट, पुणे-नागपूरातून दोघांना उचलले; कारवाईनंतर जितेंद्र आव्हाडांचा ट्विटरहल्ला

By संजय तिपाले | Updated: June 21, 2023 17:53 IST

चव्हाणला गडचिरोली पोलिसांनी पुण्यातील शिवाजीनगरमधून ताब्यात घेतले, पण त्यांच्याकडे अटक वॉरंट नव्हते, अंगात पोलिसांचा ड्रेसही नव्हता.

गडचिरोली : ट्विटरवरुन वादग्रस्त पोस्ट केल्याच्या आरोपाखाली गडचिरोलीपोलिसांनी २१ जून रोजी पुणे व नागपूर येथून दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, पुण्यातून एका युवकास ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन गडचिरोली पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेऊन महाराष्ट्रात हा काय प्रकार सुरु आहे, असा सवाल केला.

आदित्य चव्हाण व भारत पोरेडी अशी ताब्यात घेतलेल्या संशियत आरोपींची नावे आहेत. चव्हाणला पुण्यातून तर पोरेडीला नागपूर येथून २१ रोजी पहाटे ताब्यात घेतले आहे. गडचिरोली ठाण्यात ३१ मे २०२३ रोजी दोन ट्विटर हँडलरवर गुन्हा नोंद झाला होता. आक्षेपार्ह व वादग्रस्त मजकूर पोस्ट करुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा तक्रारदाराचा आरोप होता. दरम्यान, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलने याचा तांत्रिक तपास केला.   

ट्विटर तसेच एका खासगी मोबाइल कंपनीकडून मागविलेल्या तपशीलावरुन आदित्य चव्हाण व भारत पोरेडी यांनी हे ट्विटर अकाऊंड हाताळल्याचे समोर आले. त्यानंतर गुन्हे शाखेची दोन पथके पोलिस अधीक्षक नीलोत्पल व पो.नि.उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी शोधकामी रवाना झाली. २१ जून रोजी पहाटे पुण्यातून आदित्य चव्हाण व नागपूर येथून भारत पोरेडी यांना अटक करण्यात आली.

आव्हाडांनी काय केला आरोप ?

 दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पोस्ट करुन गडचिरोली पोलिसांच्या कारवाईबाबत आरोप केला. त्यानुसार, चव्हाणला गडचिरोली पोलिसांनी पुण्यातील शिवाजीनगरमधून ताब्यात घेतले, पण त्यांच्याकडे अटक वॉरंट नव्हते, अंगात पोलिसांचा ड्रेसही नव्हता. आई- बहिणीने अडविले असता त्यास चतु:श्रृंगी ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी त्याच्या आई- बहिणीशी वाद घातला व नंतर खासगी गाडीत घेऊन गेले. अंगात खाकी वर्दीही नव्हती. त्याच्या जीवाचे बरेवाईट झाले तर संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकारची राहील, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. चव्हाणच्या आईने हा संपूर्ण घटनाक्रम चतु:श्र्रुंगी ठाण्यातून सांगितल्याचाही पोस्टमध्ये उल्लेख आहे.

गडचिरोली पोलिस ठाण्यात ३१ मे रोजी गुन्हा नोंद झाला होता. त्याचा तांत्रिक तपास केल्यावर २० दिवसांनी दोन आरोपी निष्पन्न झाले. नागपूर व पुण्यात त्यांना ताब्यात घेतले असून पथक गडचिरोलीला येत आहे. संपूर्ण कारवाई ही कायदेशीर आहे.

- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

--

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJitendra Awhadजितेंद्र आव्हाडPoliceपोलिसTwitterट्विटरGadchiroliगडचिरोली