शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

कंत्राटी शिक्षकांची वेतनावाचून उपासमार; जगायचं तरी कसं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 16:54 IST

सहा महिन्यांपासून वंचित : पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू आहे अध्यापन कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेने शासनाची परवानगी घेऊन सप्टेंबर २०२४ मध्ये कंत्राटी तत्त्वावर अर्हताधारकांची नियुक्ती जि.प. शाळांमध्ये केली. मात्र, गत आठ महिन्यांच्या कालावधीत या कंत्राटी शिक्षकांना केवळ दीड महिन्याचे मानधन दिलेले आहे. साडेसहा महिन्यांचे मानधन अजूनपर्यंत दिलेले नाही.

२०२२ मध्ये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविली; परंतु जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांकरिता अर्हताधारक उमेदवार उपलब्ध न झाल्याने येथे पदभरती होऊ शकली नाही. याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर झाला. याच वेळी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत बेरोजगार युवांना संधी देण्यात आली. तरीसुद्धा शिक्षकांची पदे रिक्त होती. या जागी कंत्राटी शिक्षक नियुक्त केले.

नियमित शिक्षक 'सुगम'मध्ये; कंत्राटींची बदली दुर्गम भागातकंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेल्या शिक्षकांना स्थानिक स्तरावर काम करणे परवडणारे होते; परंतु जेव्हा अवघड क्षेत्रातील नियमित शिक्षकांची सुगम क्षेत्रात बदली झाली तेव्हा मानधन तत्त्वावरील कंत्राटी शिक्षकांना दुसऱ्या तालुक्यांत म्हणजे भामरागड, सिरोंचा, अहेरी, मुलचेरा, कोरची, एटापल्ली यांसारख्या दुर्गम भागात पाठविण्यात आले. यांना १५ हजार रुपये मानधनात काय परवडणार, असा सवाल आहे. दुर्गम भागात बदली झालेल्या कंत्राटी शिक्षकांना आर्थिक अडचणी आहेत.

५६९ कंत्राटी शिक्षकाचा मान मिळाला, धन केव्हा ?शिक्षक जिल्ह्याच्या जि.प. शाळांमध्ये कार्यरत आहेत. इयत्ता पहिली ते चौथी, इयत्ता सहावी ते आठवीला ते अध्यापन करीत आहेत.

मानधन १५ हजार, तेसुद्धा अनियमित

  • कंत्राटी शिक्षकांना १५ हजार रुपये मानधन प्रतिमहिना दिले जाते. सदर मानधनसुद्धा नियमित मिळत नसल्याने या शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
  • आधीच कमी मानधन त्यातही ते अनियमित मिळत नसल्याने कंत्राटी शिक्षकांना दुसऱ्यांकडून उसनवार घ्यावे लागते.
  • अनेक कंत्राटी शिक्षक दुसऱ्याकडून कर्ज काढल्याने त्यांचे आर्थिक बजेट बिघडून ते कर्जबाजारी झाले आहेत.

दिवाळीनंतर दिले दीड महिन्याचे मानधनकंत्राटी शिक्षकांची नियुक्ती सप्टेंबर २०२४ मध्ये झाल्यानंतर शासनाकडून निधी प्राप्त झाला. तेव्हा दोन महिन्यांनंतर दीड महिन्याच्या अध्यापन कामाचा मोबदला देण्यात आला. दीड महिन्यांचे मानधन तेसुद्धा दिवाळी सणानंतर देण्यात आले होते.

"दुसऱ्या गावात अध्यापन करताना प्रवास खर्च किंवा निवास खर्च येतो. हा खर्च भागविणे कठीण होते. शासनाने कंत्राटी शिक्षकांना नियमित मानधन द्यावे."- कमलाकर सहारे, कंत्राटी शिक्षक

"शासनाने बेरोजगारांना शिक्षक बनण्याची संधी दिली; पण मानधन नियमित मिळत नाही. सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या कंत्राटी शिक्षकांनी उपजीविका कशावर चालवायची."- कांचन भरणे, कंत्राटी शिक्षिका

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीTeacherशिक्षक