शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक पाणीपुरवठ्यापासून वंचित

By admin | Updated: November 4, 2016 00:22 IST

देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन दोन कोटी रूपये किंमतीची अतिरिक्त

पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर : दोन कोटींची अतिरिक्त पाणी योजना निरूपयोगीदेसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन दोन कोटी रूपये किंमतीची अतिरिक्त पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र करण्यात आलेली कामे पूर्णत: सदोष असून नळ पाईपलाईन व इतर कामे अद्यापही अपूर्ण आहेत. परिणामी कुरूड गावाच्या काही भागात ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे नव्या अतिरिक्त योजनेची टाकी व जलशुद्धीकरण केंद्राचे काम करण्यात आले. मात्र नळ पाणीपुरवठ्यासाठी जुन्याच टाकीचा वापर केला जात असल्याचे वास्तव आता उजेडात आले आहे.कुरूड गावची लोकसंख्या ५ हजार ६६२ इतकी आहे. या गावात १ लाख ८० हजार लीटर क्षमतेची नळ पाणीपुरवठा योजना पूर्वीच कार्यान्वित करण्यात आली. या जुन्या नळ योजनेंतर्गत एकूण ४१४ लाभार्थ्यांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र अद्यापही ७५ टक्के कुटुंब सदर पाणीपुरवठा योजनेपासून वंचित आहेत. कुरूड गावातील सदर पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी येथे अतिरिक्त नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली. त्यानंतर प्रशासनाने तब्बल दोन कोटी रूपये किंमतीची कुरूड येथे अतिरिक्त नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत येथे टाकी व जलशुद्धीकरण यंत्रणेचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र उर्वरित कामे शिल्लक असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासाऱ्या प्रश्नांबाबत ग्रामपंचायत प्रशासन कमालीचे उदासीन असल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. दोन कोटी रूपये किंमतीच्या अतिरिक्त नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत कुरूड येथे दोन लाख लीटर पाणी क्षमतेची अतिरिक्त टाकी, नळ पाईपलाईन, इन्टेक व्हेल, मुख्य वॉल्व, जॉकवेल, प्युवर वॉटर सप्लायर, वॉटर फिल्टर, वॉटर रेसिंग, वॉटर ट्रिटमेंट प्लॅन, डिस्ट्रीब्युशन प्लेनर आदी कामे आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली होती. पाणीटाकी व जलशुद्धीकरण यंत्रणेचे काम पूर्ण झाल्यानंतर नव्याने बांधण्यात आलेल्या अतिरिक्त टाकीमध्ये वाढीव भागासाठी पाणी सोडण्यात येत नाही. जुन्या नळ योजनेच्या टाकीत पाणी सोडले जात असल्याने नव्या अतिरिक्त पाणी योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जलशुद्धीकरण यंत्रणा व पाणीटाकीच्या बांधकामात अनियमितता दिसून येत असून कामाचा दर्जा सदोष असल्याचे कामाच्या स्थितीवरून दिसून येत आहे. नव्या अतिरिक्त पाणी योजनेंतर्गत स्वतंत्र पाणी टाकी व जलशुद्धीकरण केंद्र होणार असल्याने मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होईल, या आशेने गावातील नागरिकांनी आपल्या घरी मोठ्या प्रमाणात नळ जोडणी घेतली. मात्र सद्य:स्थितीत अनेक घरातील नळाला अत्यल्प प्रमाणात पाणी नळाद्वारे येत आहे. त्यामुळे जशुद्धीकरण केंद्र व पाणीटाकी तसेच पाईपलाईनच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी कुरूडवासीयांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)