शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

चामोर्शीतील तांदूळ पोहोचला मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 1:52 PM

जिल्ह्यात धान लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र असलेल्या चामोर्शी तालुक्यातील शेतकरी उच्च प्रतीच्या बारिक तांदळाच्या धानाचे उत्पादन घेत आहेत.

ठळक मुद्देमोठ्या शहरातून मागणीरूचकर व बारिक तांदळाला अधिक पसंती

लोमेश बुरांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात धान लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र असलेल्या चामोर्शी तालुक्यातील शेतकरी उच्च प्रतीच्या बारिक तांदळाच्या धानाचे उत्पादन घेत आहेत. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाची चामोर्शी शहरात भरडाई केली जाते. त्यानंतर मागणीनुसार राईस मिल मालक मोठ्या शहरांसह परराज्यात चामोर्शीतील बारिक तांदळाचा पुरवठा करीत आहेत. यंदाही शेकडो क्विंटल बारिक तांदूळ मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात पोहोचला आहे.चामोर्शी तालुका मुख्यालयी एकूण १६ राईस मिल आहेत. जिल्ह्यात देसाईगंज तालुक्यानंतर सर्वाधिक राईस मिल चामोर्शी तालुक्यात आहेत. शेतकरी खरीप हंगामात विविध जातीच्या बारिक धानाची लागवड करतात. मुख्यत्त्वे उच्च प्रतीच्या बारिक तांदळाला मोठ्या शहरांसह परराज्यात मागणी असल्याने गेल्या तीन ते चार वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी बारिक धानाच्या उत्पादनाकडे वळले आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामात एकरी सरासरी २० ते २५ पोती इतके धानाचे उत्पादन झाले आहे. या भागातील नागरिकांचा आर्थिक लेखाजोखा व उदरनिर्वाह धान उत्पादनावरच चालतो. धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने चामोर्शीत तांदळाची बाजारपेठही उपलब्ध झाली आहे.येथील राईस मिलमध्ये अत्याधुनिक तंत्राचा वापर करून तांदळावर प्रक्रिया होऊ लागली. पाहतापाहता चामोर्शी तालुक्यातील तांदळाला मध्यप्रदेशासह छत्तीसगड राज्यात मागणी वाढली. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील बीड, लातूर, वाशिम तसेच मुंबई, पुणे या मोठ्या शहरांतही चामोर्शीच्या तांदळाला बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.शहरातील अनेक मोठ्या राईस मिलमध्ये बारिक धानाच्या तांदळाची पोती तयार करून ती विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. राईस मिलमधून निघणाºया धानाच्या कोंड्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. येथील कोंडा विटाभट्टी, पॉवर प्लान्ट व इतर कंपन्यांना पुरविला जात आहे.अशी होते तांदूळ निर्मिती प्रक्रियाराईस मिलमध्ये भरडाईसाठी तांदूळ आणल्यानंतर डिशमधून खडे, कचरा आदींची साफसफाई केली जाते. त्यानंतर रबर रोलरमध्ये धान भरडाईसाठी टाकला जातो. त्यानंतर यंत्रातून तांदूळ व कुकूस वेगवेगळे केले जातात. ग्रेडर मशीनमधून बारिक व ठोकळ तांदूळ वेगवेगळा केला जातो. त्यानंतर तांदळाला तीन वेळा पॉलिशची प्रक्रिया करून दोन वेळा सिल्की व पुन्हा ग्रेडिंग केल्यानंतर सॉरिटेजमधून बाहेर आलेला तांदूळ पोत्यात भरला जातो. अशा प्रकारे तांदूळ निर्मिती प्रक्रिया पूर्ण केली जाते.

टॅग्स :agricultureशेती