शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

रात्री होणाऱ्या चॅटिंगमुळे नवरा-बायकोची उडाली झोप; मोबाईलमुळे सुखी संसारात 'महाभारत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 15:37 IST

या साेशल मीडियाचा वापर चांगल्या कामात हाेण्याऐवजी जुन्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, नातेवाइकांशी आवश्यकतेपेक्षा जास्त संपर्क ठेवणे आदींमुळे पती व पत्नीमध्ये संशयाची भावना बळावत आहे.

ठळक मुद्देपती-पत्नीत वाढले वाद : व्हाॅट्सॲप, फेसबुकचा परिणाम

गडचिराेली : पती-पत्नीचे नाते म्हणजे स्नेहाचे, साैख्याचे, एकमेकांना समजून घेण्याचे आहे. मात्र, आधुनिक काळात व्हाॅट्सॲप, फेसबुक या साेशल मीडियाचा वापर प्रचंड वाढल्याने तसेच रात्री हाेणाऱ्या चॅटिंगवर काही पती-पत्नींमध्ये भांडणे हाेत आहेत. विशेष करून दिवसापेक्षा ही भांडणे रात्री हाेत असल्याने त्यांची झाेपही उडत आहे.

एकमेकांवर १०० टक्के विश्वास ठेवून संसारात वाटचाल करणाऱ्या जाेडप्यांचे जीवन सुखी राहते. मात्र, स्मार्टफाेन हाती आल्यापासून काही ठिकाणी पत्नी तर काही ठिकाणी पती रात्रीच्या सुमारास चॅटिंग करीत असल्याने दाेघांमध्ये भांडणे हाेतात.

या साेशल मीडियाचा वापर चांगल्या कामात हाेण्याऐवजी जुन्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, नातेवाइकांशी आवश्यकतेपेक्षा जास्त संपर्क ठेवणे आदींमुळे पती व पत्नीमध्ये संशयाची भावना बळावत आहे. संशयवृत्तीतूनच दाेघांमध्ये खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. विशेष करून पती-पत्नी नाेकरी किंवा व्यवसायानिमित्त वेगवेगळे राहत असल्यास अशा कुटुंबांमध्ये अधिकच गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सधन कुटुंबीयांमध्येच साेशल मीडियाच्या अतिवापरावरून भांडणे हाेत असल्याचे पुढे येत आहे.

पती-पत्नीच्या वादाला मोबाइल हेच कारण

  • माेबाइलवरून संभाषणासाेबतच व्हाॅट्सॲप चॅटिंग ही गाेष्ट सर्रास झाली आहे.
  • हाच माेबाइल व ही चॅटिंग पती-पत्नीच्या वादाचे माेठे कारण आहे.

 

वर्षभरात अल्प तक्रारी

पती-पत्नींमध्ये साेशल मीडियाच्या वापरावरून वाद हाेत असल्याच्या वर्षभरात पाेलीस प्रशासनाकडे पाच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी शहरी भागातूनच आल्या आहेत.

सोशल मीडियामुळे नवरा-बायकोतील संवाद संपला

फेसबुक, व्हाॅट्सॲप, इन्स्टाग्रामच्या अतिवापरामुळे पती-पत्नी दाेघेहीजण आपल्याच विश्वात मग्न असतात. साेशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवरा-बायकाेतील संवाद संपल्याचे दिसून येते. पूर्वीसारख्या गप्पा-गाेष्टी आता हाेत नाही. उरलेला वेळ टीव्हीसमाेर घालविला जाताे.

रात्री मोबाइलपासून दूर राहिलेलेच बरे

  • पती-पत्नी दाेघेहीजण दिवसभर कामात व्यस्त राहतात.
  • सायंकाळी व रात्री एकमेकांशी गप्पा-गाेष्टी करणे आवश्यक आहे. यासाठी माेबाइलपासून दूर राहावे.

 

बायको वेळच देत नाही...

संसारिक जबाबदारी, राेजगार, कामे व इतर बाबींमुळे पती-पत्नी प्रचंड व्यस्त असतात. असे असले तरी दाेघांनीही एकमेकांना वेळ देणे गरजेचे आहे. नाहीतर त्यांच्यातील संवाद संपुष्टात येऊन मनभेद व मतभेद वाढण्याची शक्यता अधिक असते.

नवरा वेळच देत नाही...

दिवसभर नोकरी किंवा व्यवसायानिमित्त पती बाहेर असला तरी चालते. मात्र, सायंकाळपासून सकाळपर्यंत घरी राहून त्याने पत्नीशी हितगुज करणे आवश्यक आहे. पतीने तिला वेळ दिला पाहिजे.

टॅग्स :Socialसामाजिकhusband and wifeपती- जोडीदारmarriageलग्नMobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडिया