शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

रात्री होणाऱ्या चॅटिंगमुळे नवरा-बायकोची उडाली झोप; मोबाईलमुळे सुखी संसारात 'महाभारत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 15:37 IST

या साेशल मीडियाचा वापर चांगल्या कामात हाेण्याऐवजी जुन्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, नातेवाइकांशी आवश्यकतेपेक्षा जास्त संपर्क ठेवणे आदींमुळे पती व पत्नीमध्ये संशयाची भावना बळावत आहे.

ठळक मुद्देपती-पत्नीत वाढले वाद : व्हाॅट्सॲप, फेसबुकचा परिणाम

गडचिराेली : पती-पत्नीचे नाते म्हणजे स्नेहाचे, साैख्याचे, एकमेकांना समजून घेण्याचे आहे. मात्र, आधुनिक काळात व्हाॅट्सॲप, फेसबुक या साेशल मीडियाचा वापर प्रचंड वाढल्याने तसेच रात्री हाेणाऱ्या चॅटिंगवर काही पती-पत्नींमध्ये भांडणे हाेत आहेत. विशेष करून दिवसापेक्षा ही भांडणे रात्री हाेत असल्याने त्यांची झाेपही उडत आहे.

एकमेकांवर १०० टक्के विश्वास ठेवून संसारात वाटचाल करणाऱ्या जाेडप्यांचे जीवन सुखी राहते. मात्र, स्मार्टफाेन हाती आल्यापासून काही ठिकाणी पत्नी तर काही ठिकाणी पती रात्रीच्या सुमारास चॅटिंग करीत असल्याने दाेघांमध्ये भांडणे हाेतात.

या साेशल मीडियाचा वापर चांगल्या कामात हाेण्याऐवजी जुन्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, नातेवाइकांशी आवश्यकतेपेक्षा जास्त संपर्क ठेवणे आदींमुळे पती व पत्नीमध्ये संशयाची भावना बळावत आहे. संशयवृत्तीतूनच दाेघांमध्ये खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. विशेष करून पती-पत्नी नाेकरी किंवा व्यवसायानिमित्त वेगवेगळे राहत असल्यास अशा कुटुंबांमध्ये अधिकच गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सधन कुटुंबीयांमध्येच साेशल मीडियाच्या अतिवापरावरून भांडणे हाेत असल्याचे पुढे येत आहे.

पती-पत्नीच्या वादाला मोबाइल हेच कारण

  • माेबाइलवरून संभाषणासाेबतच व्हाॅट्सॲप चॅटिंग ही गाेष्ट सर्रास झाली आहे.
  • हाच माेबाइल व ही चॅटिंग पती-पत्नीच्या वादाचे माेठे कारण आहे.

 

वर्षभरात अल्प तक्रारी

पती-पत्नींमध्ये साेशल मीडियाच्या वापरावरून वाद हाेत असल्याच्या वर्षभरात पाेलीस प्रशासनाकडे पाच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी शहरी भागातूनच आल्या आहेत.

सोशल मीडियामुळे नवरा-बायकोतील संवाद संपला

फेसबुक, व्हाॅट्सॲप, इन्स्टाग्रामच्या अतिवापरामुळे पती-पत्नी दाेघेहीजण आपल्याच विश्वात मग्न असतात. साेशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवरा-बायकाेतील संवाद संपल्याचे दिसून येते. पूर्वीसारख्या गप्पा-गाेष्टी आता हाेत नाही. उरलेला वेळ टीव्हीसमाेर घालविला जाताे.

रात्री मोबाइलपासून दूर राहिलेलेच बरे

  • पती-पत्नी दाेघेहीजण दिवसभर कामात व्यस्त राहतात.
  • सायंकाळी व रात्री एकमेकांशी गप्पा-गाेष्टी करणे आवश्यक आहे. यासाठी माेबाइलपासून दूर राहावे.

 

बायको वेळच देत नाही...

संसारिक जबाबदारी, राेजगार, कामे व इतर बाबींमुळे पती-पत्नी प्रचंड व्यस्त असतात. असे असले तरी दाेघांनीही एकमेकांना वेळ देणे गरजेचे आहे. नाहीतर त्यांच्यातील संवाद संपुष्टात येऊन मनभेद व मतभेद वाढण्याची शक्यता अधिक असते.

नवरा वेळच देत नाही...

दिवसभर नोकरी किंवा व्यवसायानिमित्त पती बाहेर असला तरी चालते. मात्र, सायंकाळपासून सकाळपर्यंत घरी राहून त्याने पत्नीशी हितगुज करणे आवश्यक आहे. पतीने तिला वेळ दिला पाहिजे.

टॅग्स :Socialसामाजिकhusband and wifeपती- जोडीदारmarriageलग्नMobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडिया