शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

रात्री होणाऱ्या चॅटिंगमुळे नवरा-बायकोची उडाली झोप; मोबाईलमुळे सुखी संसारात 'महाभारत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 15:37 IST

या साेशल मीडियाचा वापर चांगल्या कामात हाेण्याऐवजी जुन्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, नातेवाइकांशी आवश्यकतेपेक्षा जास्त संपर्क ठेवणे आदींमुळे पती व पत्नीमध्ये संशयाची भावना बळावत आहे.

ठळक मुद्देपती-पत्नीत वाढले वाद : व्हाॅट्सॲप, फेसबुकचा परिणाम

गडचिराेली : पती-पत्नीचे नाते म्हणजे स्नेहाचे, साैख्याचे, एकमेकांना समजून घेण्याचे आहे. मात्र, आधुनिक काळात व्हाॅट्सॲप, फेसबुक या साेशल मीडियाचा वापर प्रचंड वाढल्याने तसेच रात्री हाेणाऱ्या चॅटिंगवर काही पती-पत्नींमध्ये भांडणे हाेत आहेत. विशेष करून दिवसापेक्षा ही भांडणे रात्री हाेत असल्याने त्यांची झाेपही उडत आहे.

एकमेकांवर १०० टक्के विश्वास ठेवून संसारात वाटचाल करणाऱ्या जाेडप्यांचे जीवन सुखी राहते. मात्र, स्मार्टफाेन हाती आल्यापासून काही ठिकाणी पत्नी तर काही ठिकाणी पती रात्रीच्या सुमारास चॅटिंग करीत असल्याने दाेघांमध्ये भांडणे हाेतात.

या साेशल मीडियाचा वापर चांगल्या कामात हाेण्याऐवजी जुन्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, नातेवाइकांशी आवश्यकतेपेक्षा जास्त संपर्क ठेवणे आदींमुळे पती व पत्नीमध्ये संशयाची भावना बळावत आहे. संशयवृत्तीतूनच दाेघांमध्ये खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. विशेष करून पती-पत्नी नाेकरी किंवा व्यवसायानिमित्त वेगवेगळे राहत असल्यास अशा कुटुंबांमध्ये अधिकच गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सधन कुटुंबीयांमध्येच साेशल मीडियाच्या अतिवापरावरून भांडणे हाेत असल्याचे पुढे येत आहे.

पती-पत्नीच्या वादाला मोबाइल हेच कारण

  • माेबाइलवरून संभाषणासाेबतच व्हाॅट्सॲप चॅटिंग ही गाेष्ट सर्रास झाली आहे.
  • हाच माेबाइल व ही चॅटिंग पती-पत्नीच्या वादाचे माेठे कारण आहे.

 

वर्षभरात अल्प तक्रारी

पती-पत्नींमध्ये साेशल मीडियाच्या वापरावरून वाद हाेत असल्याच्या वर्षभरात पाेलीस प्रशासनाकडे पाच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी शहरी भागातूनच आल्या आहेत.

सोशल मीडियामुळे नवरा-बायकोतील संवाद संपला

फेसबुक, व्हाॅट्सॲप, इन्स्टाग्रामच्या अतिवापरामुळे पती-पत्नी दाेघेहीजण आपल्याच विश्वात मग्न असतात. साेशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवरा-बायकाेतील संवाद संपल्याचे दिसून येते. पूर्वीसारख्या गप्पा-गाेष्टी आता हाेत नाही. उरलेला वेळ टीव्हीसमाेर घालविला जाताे.

रात्री मोबाइलपासून दूर राहिलेलेच बरे

  • पती-पत्नी दाेघेहीजण दिवसभर कामात व्यस्त राहतात.
  • सायंकाळी व रात्री एकमेकांशी गप्पा-गाेष्टी करणे आवश्यक आहे. यासाठी माेबाइलपासून दूर राहावे.

 

बायको वेळच देत नाही...

संसारिक जबाबदारी, राेजगार, कामे व इतर बाबींमुळे पती-पत्नी प्रचंड व्यस्त असतात. असे असले तरी दाेघांनीही एकमेकांना वेळ देणे गरजेचे आहे. नाहीतर त्यांच्यातील संवाद संपुष्टात येऊन मनभेद व मतभेद वाढण्याची शक्यता अधिक असते.

नवरा वेळच देत नाही...

दिवसभर नोकरी किंवा व्यवसायानिमित्त पती बाहेर असला तरी चालते. मात्र, सायंकाळपासून सकाळपर्यंत घरी राहून त्याने पत्नीशी हितगुज करणे आवश्यक आहे. पतीने तिला वेळ दिला पाहिजे.

टॅग्स :Socialसामाजिकhusband and wifeपती- जोडीदारmarriageलग्नMobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडिया